मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन,संचारबंदी व जमावबंदी असतानाही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवेढा तालुक्यातील १५ जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
महाराष्ट्र शासनाने महानगरपालिका, नगरपालिका कक्षेत मुंबई पोलिस अधिनियम १४४ प्रमाणे आदेशीत करून पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसम एकत्र जमा होणार नाहीत थांबणार नाहीत तसेच इतर राज्यातून , जिल्हयातून अगर तालुक्यातून दुसऱ्या राज्यात , जिल्हयात अगर तालुक्यात प्रवास करणार नाहीत असा आदेश असतानाही लहू रेवाप्पा राठोड (बालाजीनगर),अमोल भिमाशंकर तुपलोंढे (अरळी) , लक्ष्मी अमोल तुपलोंढे (अरळी) ,मल्लाप्पा नागप्पा तळवार (नंदूर), विमल मलप्पा तळवार (नंदूर) ,
विजय शिवाजी देवकते (आंधळगांव) , युवराज ज्ञानू अवघडे (जुनोनी) , पूजा महेश वाघमारे (जुनोनी) ,प्रल्हाद शामराव भोसले (हुन्नूर) , दगडू निवृत्ती अनपट (गणेशवाडी) ,शिवाजी दगडू अनपट (गणेशवाडी) , गोपाळ तुकाराम लेंडवे (लेंडवे चिंचाळे) ,पुष्पा गोपाळ लेंडवे (लेंडवे चिंचाळे) , श्रीकांत गोपाळ लेंडवे (लेंडवे चिंचाळे) व गौरी गोपाळ लेंडवे (लेंडवे चिंचाळे) या १५ जणांनी आदेशाचे उल्लंघन केले अशी फिर्याद पो.ना.राजकुमार ढोबळे यांनी मंगळवेढा पोलिसात दिली.
पोलिसांनी आरोपीविरूध्द भा . दं . वि . स . कलम १८८,२६९,२७०, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब) साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम २ , ३ व ४ नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
———————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज