मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरु आहे. पहिल्या तीन लॉकडाउनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाउनसाठी मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत.२२ मे पासून नवीन आदेश लागू होणार असून ते ३१ मे पर्यंत कायम राहतील. मुंबई महानगर प्रदेशासह पुणे,नाशिक, सोलापूर,मालेगाव, सोलापूर, जळगाव, अकोला, अमरावती. औरंगाबाद ही महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. रिपब्लिक वाहिनीने हे वृत्त दिले आहे. रेड झोनच्या बाहेर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बस,टॅक्सी वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे.
Coronavirus Lockdown 4.0
What’s allowed & not allowed in Maharashtra#WarAgainstVirus pic.twitter.com/lu92bXTQin
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 19, 2020
महाराष्ट्र सरकारने 17 मे रोजी पत्रक काढून लॉकडाऊन 4 ची घोषणा केली. त्यानंतर केंद्रानेही त्याच दिवशी लॉकडाऊन वाढवला. मात्र केंद्राने या चौथ्या लॉकडाऊनची नियमावली ठरवण्याचे अधिकार राज्यांना दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने नियमावली जारी केली आहे. आता हे नियम 22 मे पासून 31 मेपर्यंत लागू राहतील.
चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर
चौथा लॉकडाऊन 31 मे पर्यंत असेल
22 मेपासून लॉकडाऊनचे नवे नियम लागू होऊन ते 31 मेपर्यंत राहतील.
सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद. केवळ देशांतर्गत अत्यावश्यक सेवेसाठी हवाई वाहतूक सुरु राहील
मेट्रो रेल्वे बंद राहतील
शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र, शिकवणी वर्ग बंद राहतील. केवळ ऑनलाईन वर्ग सुरु राहतील
पुढील गोष्टींना बंदी कायम
1. डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार
2. मेट्रोसेवा बंद राहणार
3. शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन
4. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार.
केवळ विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस डेपोमधील उपहारगृहे, तसेच पोलीस, आरोग्य अधिकारी, सरकारी अधिकारी, पर्यटकांसह अडकलेले मजूर, क्वारंटाईन भागातील उपहारगृहे सुरु.
5. सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार बंद राहणार.
6. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
7. सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार
– रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत सक्त संचारबंदी, जीवनावश्यक सेवा वगळता
– 65 वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन लॉकडाऊन 4 ची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडू सरकारने लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती.
लॉकडाऊन कसा वाढत गेला?
पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल (21 दिवस)
दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे (19 दिवस)
तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे (14 दिवस)
चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे (14 दिवस)
देशात 25 मार्चपासून पहिला लॉकडाऊनचा टप्पा सुरु झाला. 21 दिवसांचा पहिला टप्पा 14 एप्रिलला संपला. दुसरा लॉकडाऊन 15 एप्रिल ते 3 मे असा होता. तिसरा लॉकडाऊन 3 मे रोजी सुरु होऊन 17 मेपर्यंत चालला. 17 मेनंतर चौथ्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन सूचना द्यावा, असे पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. (Maharashtra Lockdown 4.0 Guidelines)
—————————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज