टीम मंगळवेढा टाईम्स । लॉकडाउन चारवेळा वाढवूनही रुग्ण संख्या कमी होत नसल्याने आता योग्य ती खबरदारी घेऊन राज्य सरकार शिथिल करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारी व खासगी कार्यालये व शाळा सुरु करण्यापूर्वी 55 वर्षांवरील विशेषतः ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आराम देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. तर शाळा सुरु करण्याचा मुहूर्त 15 जूनऐवजी आणखी काही दिवस पुढे ढकलला जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
राज्यातील ऑरेंज झोनमधील वाशीम व वर्धा जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्र सद्यस्थितीत रेड झोनमध्ये पोहोचला आहे. राज्यातील रुग्णसंख्येने आता 60 हजाराचा टप्पा ओलांडला असून सुमारे दोन हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू होणाऱ्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयरोग असे विकार असलेल्या व्यक्तींचा सर्वाधिक समावेश आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातील कोरोनाचे वैश्विक संकट हद्दपार करण्याच्या हेतूने मागील 67 दिवसांपासून (22 मार्च) लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊन सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत होतील, असा विश्वास होता. मात्र, परस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र आहे.
तत्पूर्वी, राज्यातील पोलीस दलातील सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यात काहींचा मृत्यूही झाला. त्यानंतर खबरदारी म्हणून गृहमंत्रालयाने 55 वर्षांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्यास सांगितले. तर 30 टक्के कर्मचाऱ्यांना आलटून-पालटून आराम दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत सरकारी कार्यालयातील 55 वर्षांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आराम देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली. मात्र, ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयरोग असे विकार आहेत, त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असेही सांगण्यात आले.
14 शहर-जिल्ह्यांमध्ये रुग्णांचा वाढतोय वेग
22 मार्चपासून आतापर्यंत चारवेळा लॉकडाऊन करूनही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 74 वरून 60 हजारांवर पोहचली आहे. त्यामध्ये एकट्या मुंबई महानगरपालिका परिसरामध्ये 35 हजार 485 रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत 25 हजार 694 रुग्ण उपचार घेत आहेत. त्या पाठोपाठ ठाणे महापालिका परिसरात आठ हजार 220 रुग्ण सापडले असून सध्या पाच हजार 765 रुग्ण उपचार घेत आहेत तर पुण्यामध्ये सहा हजार 896 रुग्ण सापडले असून तीन हजार 353 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
तसेच औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार 370 रुग्ण सापडले असून 431 रुग्ण उपचार घेत आहेत. सोलापुरातील 822 रुग्णांपैकी 501 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रायगड जिल्ह्यातील 944 पैकी 428 रुग्णांवर उपचार सुरू असून पालघर जिल्ह्यातील 825 पैकी 529 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर नाशिक जिल्ह्यातील 1043 रुग्णांपैकी 236 रुग्णांवर उपचार सुरू असून जळगाव जिल्ह्यातील 526 पैकी 235 रुग्ण उपचार घेत आहेत. साताऱ्यातील 429 पैकी 285 रुग्णांवर उपचार सुरू असून उर्वरित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर कोल्हापुरातील 351 रुग्णांपैकी 314 रुग्ण दवाखान्यांमध्ये उपचार घेत असून रत्नागिरीतील 204 पैकी 123 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच अकोल्यातील 529 पैकी 250 रुग्णांवर उपचार सुरू असून नागपुरातील 495 पैकी 150 रुग्ण दवाखान्यांमध्ये दाखल आहेत.
In the entire Maharashtra Red Zone; ‘These’ two districts only in the Orange Zone
—————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज