मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. तर सोलापूर जिल्ह्यात व विदर्भात तापमाने 44 अंशाचा उच्चांक गाठला आहे.

तर काही भागात पाऊस देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच हवामान विभागाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. 20 ते 22 एप्रिलदरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळं नागरिकांना सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच हवामानातील बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असं आवाहन राज्याच्या कृषी विभागानं केलं आहे.

खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता
पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत आहेत,
ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह (पुणे विभाग) मराठवाडा (प्रामुख्याने दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भात (प्रामुख्याने अमरावती विभाग) देखील काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल. मात्र 22 तारखेला वादळी पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत घट होईल.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी:
शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत, काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री/झाकणाने सुरक्षित ठेवावीत, वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी
शेतमाल, भाजीपाला व इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये
राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे
दरम्यान, सध्या राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट आली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा गडतिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 44 अंशावर गेला आहे. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. वाढत्या तापमानामुळं शाळांच्या वेळामध्येही बदल करण्यात आले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















