मंगळवेढा टाईम्स न्युज ।
दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यांत घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेसंदर्भात काही अडचणी, समस्या निर्माण झाल्यास योग्य मार्गदर्शन मिळावे आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी,

या उद्देशाने राज्य बोर्डाने तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. त्यांना किंवा मंडळाच्या हेल्पलाइनवर कॉल करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घेता येणार आहे.

१० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीमध्ये इयत्ता १२ वीची परीक्षा व २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत इयत्ता १० वीची परीक्षा होणार आहे.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात होत असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यंदाच्या वर्षी दहावीचे ६४ हजार ४५४ तर बारावीचे ५४ हजार ८७६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावर विशेष पथके कार्यरत राहतील. परीक्षेच्या माहितीसाठी हेल्पलाइन ९९६०६४४४११, ७९७२५७३७४२, ९८३४०८४५९३, ९३६९९७८३१५, ८१६९२०२२१४, ९३७१६६१२५५, ७२०८४२९३८१, ७७०९१५६०६८, ८४२११५०५२८, ९४९४७८३९९६

विद्यार्थी परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय आम्ही आमच्या स्तरावरून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून परीक्षेसंदर्भातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.-सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सोलापूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















