मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सोलापूर शहरात गुरुवारी झालेल्या दुहेरी आत्महत्येचे कोडे उलगडले आहे. २३ वर्षीय अश्विनी केशापुरे हिने प्रेमभंगातून, तर तिला बहीण मानत असलेल्या रोहित ठणकेदारने तिच्यासाठी जीवन संपवल्याचे पोलिस तपासात पुढे आले असल्याचे दिव्य मराठी यांनी वृत्त प्रसिद्ध केले आहे.
पोलिसांनी आत्महत्येपूर्वी अश्विनीने लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे त्यांच्या चार मित्रांचे जबाब घेतले. त्यांनी सांगितल्यानुसार रोहित तिला बहीण, इतकेच नव्हे तर आई मानत होता, तसेच तो स्वभावाने हळवा होता.
तीच राहणार नसेल तर मी जगून काय करू असा विचार करून त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे असे मित्रांनी सांगितले, या चौघांचे मोबाइलही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यातून अजून माहिती समोर येईल.
रोहित उर्फ ऋग्वेद भिमू ठणकेदार (२३) आणि अश्विनी वीरेश केशापुरे (२३) यांनी कर्णिकनगरातील एका घरात आत्महत्या केली. सिलिंग अँगलला दोघांनी एकाच ओढणीने गळफास घेतला. रोहित हा गाडे यांच्या चारचाकी वाहनावर चालक होता.
गुरुवारी सकाळी तो काम झाल्यानंतर गाडे यांची दुचाकी घेऊन गाडे यांच्या कर्णिकनगरातील बंद घरी आराम करण्यासाठी आला. तिथे अश्विनी केशापुरे देखील आली. दोघांनी स्वतःचे मोबाइल बंद केले, सुसाइड नोट लिहिली असावी. त्यानंतर गळफास घेतला, मालक गाडे रोहितचा शोध घेत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
एका वृद्धेने सांगितले होते ‘तुझे आईवडील खरे नाहीत…’ तेव्हापासून रोहित अश्विनीला आई मानायचा
… अश्विनी का दुखावली होती ?
आदित्य, राज व रोहित हे तिघे जण शालेय जीवनापासून मित्र होते. आदित्य व अश्विनी पाच वर्षांपासून प्रेमात होते. त्यांचा प्रेमभंग झाल्यानंतर आदित्य दोड वर्षांपासून नैना नावाच्या मुलीबरोबर राहू लागला. त्यांनी लग्न करायचे ठरवले होते. पण, अश्विनी खूप दुखावली होती.
आदित्यला दूर होण्यात नैना जबाबदार असल्याचे अश्विनीला वाटत होते. त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न राज व गौरी करत होते. यासाठी आठवड्यापूर्वी सर्वजण एकत्र भेटले. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. पण आदित्यने नकार दिला. या तणावातून अश्विनीने टोकाचे पाऊल उचलले.
… रोहित का होता नैराश्याच्या गर्तेत
जबाब देताना मित्रांनी सांगितले की, रोहित मैत्रीला जागणारा होता. एका म्हातारीने त्याला सांगितले होते की, त्याचे आईवडील खरे नाहीत. तेव्हापासून रोहित अश्विनीलाच आई संबोधत होता. त्या दोघांचे बहीणभावाचे नाते होते. दोघेजण गुरुवारी कर्णिक नगरातील घरात एकमेकांच्या दुःखातून खूप रडले. आईसमान अश्विनी आत्महत्या करणार असेल, तर मी तरी जगून काय करू, असा विचार रोहितने केला. त्यातून त्यानेही गळफास घेतला असावा.
अश्विनीचा मित्र आदित्य बँजोच्त्या व्यवसायात तर नैना घेते पदवीचे शिक्षण
आदित्यचा वैजो वाजवण्याच्या व्यवसाय आहे. त्याचे शिक्षण १२ वी झाले आहे. तरी नैना पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. गौरीचे बीएस्सी झाले असून सध्या ती घरीच असते. राज खासगी हॉस्पिटलमध्ये काम करतो. या सगळ्यांच्या पालकांना काहीच माहीत नाही.
दोघांच्या पालकांचेही जबाब घेणार
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिड्डीत उल्लेख असल्याप्रमाणे अश्विनी आणि रोहित यांच्या चार मित्र-मैत्रिणींचे जबाब घेतले. अत्यविधी झाल्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांचे जबाब घेण्यात येतील. त्यानुसार पुढील तपास होईल.” प्रमोद वाघमारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज