टीम मंगळवेढा टाईम्स।
यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या T 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. यात विराट कोहली कर्णधार तर रोहीत शर्मा हा उपकर्णधार असेल.
ऋषभ पंत आणि इशान किशन हे टीम इंडियाचे यष्टीरक्षक असतील. ज्यांना 15 खेळाडूंमध्ये निवडण्यात आलंय त्यात
केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दीक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर,आर. अश्विन, अक्सर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीचा समावेश आहे.
भारतीय नियमक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने टी-20 साठी खेळाडूंची यादी जाहीर केलीय. यामध्ये संघात मोठे बदल केले आहेत.
ऋषभ पंत आणि इशान किशन हे टीम इंडियाचे यष्टीरक्षक असतील तर संघाचा मेन्टॉर म्हणून भारताचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी काम पाहणार आहे.
म्हणजेच विराटसेनेला अनुभवी अशा महेंद्रसिंग धोनीचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार आहे.
भारताचे विश्वचषकातील सामने
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-
भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)
आधी भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता.
दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी खेळवले जाणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज