टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्या सुमारे चार हजारजणांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. 2015 मध्ये निवडणूक लढविलेल्या मात्र निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या 3 हजार 793 जणांना यंदाची निवडणूक लढवता येणार नाही.
असा आदेश आयोगाने दिला असून, अपात्र ठरलेल्यांची यादी निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिली आहे. यामुळे संबंधित भावी कारभार्यांच्या निवडणूक रिंगणात उतरण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागला आहे.
मागील ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या सर्वच उमेदवारांनी निवडणुकीमध्ये केलेला खर्च प्रशासनाला सादर करणे अनिवार्य होते मात्र निवडणूक निवडून आलेले व रिंगणात असलेल्या 3 हजार 840 जणांनी या नियमाचे पालन केले नाही.
त्यामुळे संबंधितांची यादी तत्कालीन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी 30 जानेवारी 2017 रोजी निवडणूक आयोगाला पाठविली होती.
यामध्ये तालुकानिहाय निवडणूक लढण्यास अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने ही यादी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दिली आहे.
त्यामुळे यंदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज छाननीच्या वेळी या यादीत नाव आहे की नाही, याची खात्री करुनच अर्जाला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.त्यामुळे संभाव्य उमेदवारांना इच्छा असतानाही निवडणूक लढविता येणार नाही.
अर्ज दाखल केला तरी तो बादच होणार असल्याने अनेक उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे. तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला निवडणूकच लढवता येणार नसल्याने विरोधी उमेदवारांकडून आंदोत्सव होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज