मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
वेळापूरजवळ शनिवारी (ता.१) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास टँकर व कारचा अपघात झाला आहे .
यामध्ये पाचजण जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत . मृत्यू झालेले सर्व वैराग ( ता . बार्शी ) येथील आहेत . वैराग येथील फलफले कुटूंबीय जेजुरी येथे सकाळी देवदर्शनाला जात होते . मात्र , वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे .
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
वेळापूरजवळ पुणे – पंढरपूर महामार्गावर कार आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या टँकरची समोरासमोर धडक झाली . या भीषण अपघात कारचा चक्काचूर झाला आहे . या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यु झाला . कार पुण्याहून वैरागकडे येत असताना हा अपघात झाला . अपाघातातील सर्वजण सोलापूर जिल्ह्यात वैराग येथील आहेत .
पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत . गाडीत आठजण होते . त्यातील पाच जण ठार झाले आहेत . तर तीनजण गंभीर जखमी झाले . त्याच्यावर वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत .घटनास्थळी वेळापूर पोलिस दाखल झाले आहेत .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज