मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी गावात असणाऱ्या वनराईला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अवेळी जाळरेषा पेटविल्याने मोठी आग लागून अडतीस एकरांपैकी जवळपास २५ एकराचा परिसर जळून खाक झाला आहे. यामध्ये बऱ्यापैकी वृक्षांना आगीच्या झळा लागून अर्धवट जळालेल्या स्थितीत आहेत तर बर्यापैकी वृक्ष जळून खाक झाले आहेत.
कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे जवळपास 18000 वृक्षांपैकी 10000 वृक्षांचे या लागलेल्या आगीमुळे नुकसान झाले आहे. यामुळे वृक्षप्रेमी मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जुनोनी येथे असणाऱ्या वनाची जाळरेषा पेटविण्यासाठी शुक्रवार दिनांक 31 रोजी वनसेवक किसन कांबळे व इतर कर्मचारी गेले होते. कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून सकाळी अकराच्या दरम्यान त्यांनी जाळरेषा पेटविली. मुळात जाळरेषा पेटविण्याची ठराविक वेळ नियमात आहे व तसेच पेटविताना ऊन आणि वारा नसावा असाही नियम असताना सदर कर्मचाऱ्यांनी या कोणत्याच बाबीचा विचार न करता निष्काळजीपणाने जाळरेषा पेटविली बघता बघता संपूर्ण वनाने पेट घेतला कर्मचाऱ्यांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत परंतु परिस्थिती हाताबाहेर गेली.
यादरम्यान जुनोनी गावातील काही सतर्क नागरिकांनी व तसेच आसपासच्या गावातून आलेल्या काही नागरिकांनीही आज विझविण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे या वनाचा काही भाग जळण्यापासून वाचला.
एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करत आहे. पण झाडे जतन करण्यासाठी शासनाने जे कर्मचारी नेमली आहेत केवळ त्यांच्या निष्काळजीपणामुळे हजारो झाडांचे नुकसान होत असेल तर ती एक अक्षम्य चूक आहे. याबद्दल वृक्षप्रेमी मधून तीव्र संताप व्यक्त होत असून अशा निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही ते करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज