टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाचा प्रकोप वाढल्याने शुक्रवार दि.२१ मे सकाळी ७ ते दि.१ जूनपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये सोमवारी दिली.
या दरम्यान मेडिकल, बँका, वर्तमानपत्रे या अत्यावश्यक सेवा वगळता किराणा, भाजीपाला, दूध विक्री या आवश्यक सेवेसह अन्य दुकाने बंद राहणार आहेत.
दूध विक्री, भाजीपाला, किराणा मालाची विक्री ही सकाळी सात ते सकाळी अकरा या वेळेतच केवळ घरपोच राहणार आहे. कृषी अवजारे व शेती उत्पादनाशी संबंधित कृषी सेवा केंद्रे सकाळी सात ते सकाळी अकरा या वेळेत चालू राहतील.
शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णसंख्या वाढीबरोबरच मृत्यूदरही वाढला आहे. सोमवारी ग्रामीण भागात तब्बल ३५ जणांचा बळी गेला आहे तर २१७२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
काही केल्या कोरोना आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अचानक सर्वच सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता मंगळवार , बुधवार , गुरुवार असे तीन दिवस नागरिकांना खरेदीसाठी वेळ मिळणार आहे. शुक्रवारपासून कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. यात आणखी काय बंद काय सुरू राहणार त्याचा सविस्तर तपशील आज मंगळवारी आदेश निघाल्यानंतर समजेल.
आज सविस्तर आदेश काढणार
सध्या दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आज मंगळवारी सविस्तर आदेश काढण्यात येणार आहे , असेही त्यांनी येणार असलेली सर्व किराणा दुकाने , बाजार समितीतील शेतमालांचे लिलाव , भाजीपाला जिल्हाधिकारी विक्री , दुकानातून दूध विक्री व अन्य सेवा बंद राहणार आहेत.
मटण , चिकन व यांनी अंडी विक्रीही बंदच ठेवण्यात येणार आहे. नियमाचे उल्लंघन करणायांविरुद्ध या कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज