मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. मंगळवारी ५५२ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ५ हजार २१८ वर पोहोचलीे. तर १९ मृत्यूंची नोंद झाल्याने एकूण बळींचा आकडा २५१ झाला. त्याचप्रमाणे, मुंबईत ३५५ रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या ३ हजार ४५१ झाली आहे. तर शहर-उपनगरात १२ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा आकडा १५१ वर पोहोचला आहे. मुंबई शहर-उपनगरात कोरोनाचे २ हजार ८८७ अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. जगातही कोरोनाचा प्रकोप वाढत असून रुग्णांचा आकडा २५ लाख ३६ हजारांवर गेला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने मुंबई-पुण्यात शिथिल केलेल्या लॉकडाउनमधील सवलती पुन्हा रद्द करत अधिक काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १९ मृत्यूंमध्ये मुंबईतील १२, पुण्यातील तीन, ठाणे मनपामधील २, सांगलीतील १ आणि पिंपरी-चिंचवड येथील एक आहे. यात १० पुरुष तर ९ महिला आहेत. १९ मृत्यूंपैकी ६० वर्षे व त्यावरील ९ रुग्ण आहेत. ९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. १२ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार आढळले आहेत.
१५० जण कोरोनामुक्त
मंगळवारी १५० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ७२२ बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. सध्या ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाइन असून ७ हजार ८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. ८३ हजार नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज