टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रातील जवळपास सर्व भागांमध्ये दुपारपर्यंत ऊन आणि त्यानंतर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी पावसाचा शिडकावा हा सिलसिला सुरुच राहणार आहे.
या कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. भारताच्या दक्षिण भागापासून ते मध्यप्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये सध्या सुरू असणारा ऊन आणि पावसाचा सिलसिला पुढचा आठवडाभर सुरूच राहिल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय.
कमी दाबाचे पट्टे आणि हवेची चक्रीय स्थिती यामुळे पुढचा आठवडाभर ऊन आणि पावसाचा खेळ सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्यानं दिलाय.राज्यातील जवळपास सर्व भागांमध्ये दुपारपर्यंत ऊन आणि त्यानंतर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी पावसाचा शिडकावा हा सिलसिला सुरुच राहणार आहे.
या कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. भारताच्या दक्षिण भागापासून ते मध्यप्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
गेल्या आठवड्यापासूनच या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊसही पडला आहे.
काही ठिकाणी वादळ तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. पुढील सात दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ९ मे पर्यंत ढगांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर कोकणात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल,असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
मुंबईमध्ये तापमानात वाढ होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. मुंबईतले तापमान आताच ३५ अंशांवर गेले आहे. ते वाढून ३६ अंशांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज