सोलापूर जिल्ह्यातील दुधनी (ता.अक्कलकोट) येथील एका शेतकऱ्याच्या धर्मपत्नीनेच सोमवारचा आठवडा बाजार करण्यासाठी जाते म्हणून जाताना घरातील कपाटामधील सुमारे ४ लाख ६० हजार किमंतीचे सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम घेऊन पलायन केल्याची घटना समोर आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पूजा भागेश यरशेट्टी असे पलायन झालेल्या शेतक-याच्या धर्मपत्नीचे नांव आहे.शेतकरी भागेश मल्लप्पा यरशेट्टी हे नेहमीप्रमाणे सकाळी शेताला कामासाठी गेले होते.त्यानंतर घरी पत्नी पुजा,आई ,दोन भाऊ असे एकत्रितपणे राहतात.
शेती करुन कुटूबांची पालन पोषण करीत आहे. त्यांचे लग्न कलकत्ता येथील पुजा चौधरी हिच्या बरोबर १७ जून २०२० रोजी झाले होते. वाढता खर्च भागविण्यासाठी स्वतः ची व दुस-याची शेती सुध्दा ते करत आहेत.
दुपारच्या जेवण्यासाठी पत्नीचे मोबाईल वर फोन करुन घरी येत असल्याचे सांगत असताना पत्नीने शौचास जाऊन येणार आहे. थोड्यावेळाने या असे सांगुन फोन कट केला.
त्यानंतर भागेश दुपारी दोनच्या सुमारास घरी आले असता आई विजयलक्ष्मी तसेच बहीण राधीका असे दोधेच होते. पत्नी पुजा ही त्यांना दिसली नाही. पत्नी पुजा ही पिशवी घेवुन अक्कलकोट येथील आठवडा बाजारला जात आहे म्हणुन गेली होती.
नंतर कपडे बदलण्यासाठी भागेश यांनी कपाटाजवळ पाहिले असता कपाट अर्धवट उघडे दिसले. त्या कपाटामधील ५ तोळ सोन्याचे दागिने ( बोरमाळ,पाटल्या नेकलेस व कर्णफुले ) किमंत रुपये १ लाख रुपये व रोख ३ लाख ६० हजार रुपये असे एकुण ४ लाख ६० हजार रुपयेचे मुद्देमाल नव्हता.
याची चौकशी भागेश यांनी पत्नीला केले असता तिने फक्त पैसे घेतलेत सोने मला माहीत नाही म्हणुन फोन कट केली.
त्यानंतर भागेश यांची खात्री झाली की घरातील आईचे बहीणीचे नजर चुकवून भागेश बरोबर फोनवर खोटे बोलुन पत्नीने स्वतःच्या आर्थीक फायदया करीता घेवुन गेली असल्याचे फिर्यादीत नोंद केली आहे.
तिच्याविरुध्द दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हेडकाॕन्स्टेबल दीपक पाटील हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज