समाधान फुगारे । अन्य जिल्हयातून मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात 2 हजार 740 नागरिक आले असून शहरात 5 ठिकाणी तर ग्रामीण भागातील जि.प.च्या 81 गावातून बाहेरून आलेल्या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.दरम्यान काही व्यवसायिक ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त आपली दुकाने उघडी ठेवत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने कोणाचीही गय न करता त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिला आहे.
मंगळवेढा शहरात 82 नागरिक तर ग्रामीण भागात 2 हजार 658 नागरिक अन्य जिल्हयातून आले आहेत.या नागरिकांना शहरातील 5 ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.दरम्यान,संस्थात्मक क्वारंटाईनमधील काही लोक रात्रीच्यावेळी बाहेर फिरायला व घरी जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्याने यांना नियंत्रीत करण्यासाठी कृषी सहाय्यक यांची पथके नेमण्यात आली आहेत.
शासकीय कार्यालयातील काही कर्मचारी सोलापूरसारख्या रेडझोन तसेच अन्य ठिकाणच्या बाधित क्षेत्रातून अपडाऊन नोकरीच्या ठिकाणी करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने तहसीलदार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.संबंधित विभागाच्या अधिकार्यांना लेखी पत्र देवून कर्मचार्यांनी अपडाऊन न करता मंगळवेढा येथेच राहण्याच्या सक्त सुचना केल्या आहेत.
मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील व्यवसायिकांना सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 दुकाने उघडी ठेवण्याची वेळ निश्चित करण्यात आली असतानाही काही व्यवसायिक वेळेनंतरही आपली दुकाने सुरू ठेवत आहेत तसेच सकाळी वेळेपुर्वीही दुकाने उघडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी एक पथक नेमण्यात आले आहे.
मंगळवेढा येथील शासकीय विविध विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे सोलापूरसारख्या रेडझोनमधून दररोज नोकरीच्या ठिकाणी मंगळवेढा येथे अप डाऊन करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याने अधिकारी व कर्मचार्यांनी निवासी राहणे बंधकारक असून ये जा करणार्या कर्मचार्यावर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार यांनी दिला आहे.
Warning of action against officers and employees coming and going from the red zone
—————————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज