टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेले वर्षभर देशातील पाचशेपेक्षा जास्त शेतकरी संघटनांनी जो संघर्ष केला, त्या संघर्षाचा हा विजय आहे. या संघर्षामध्ये सहाशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची दिली.
त्या शहिदांचे त्यांच्या कुटुंबियांचे स्मरण या निमित्ताने होत आहे. यासोबतच जे लाखो शेतकरी दिल्लीच्या सिमांवर नेटाने लढले त्यांनाही स्वाभिमानीचा सलाम तीन कायदे मागे घेण्यासोबत
हमी भावाचे संरक्षण शेतकऱ्यांना मिळावे यासाठी केंद्रीय कायदा करावा केंद्र सरकारने या मागणीसंबंधी तातडीने सकारात्मक घोषणा करावी, अशी प्रमुख मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी केली आहे.
वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या पार्श्वभूमीवर केली मागील अनेक महिने एक क्षणही मागे न हटता घरापासून दूर दिल्लीच्या वेशीवर अहोरात्र देशातील शेतकरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर आज यश आले.
या बलाढ्य आंदोलनापुढे मोदी सरकारला झुकावेच लागले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.
पंतप्रधान मोदींनी केलेल्या या घोषणेचे सर्वत्र स्वागत होत आहे. हा निर्णय वेळीच घेतला असता तर सहाशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते अशी प्रतिक्रिया जिल्हा संघटक युवराज घुले यांनी व्यक्त केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज