सुरेश झिंजुरटे । मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन
कोरोना व्हायरसच्या महासंकटात एकीकडे माणस एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. एकमेकांना मदतीचा हात देत आधार देत असतानाच दुसरीकडे बीडमध्ये मात्र वादातून तिहेरी हत्याकांड झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
शेतीच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. तिथे झालेल्या वादातून तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मांगवडगाव इथे घडली असून तिहेरी हत्येनं बीड हादरलं आहे.
मांगवडगाव इथे शेतजमिनीचा वाद दोन गटांमध्ये टोकाला गेला. या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांसह एका व्यक्तीवर गावातील काही अज्ञातांनी हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं.
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासणी केली. जखमींला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल तर 3 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल आहे.
निंबाळकर कुटुंबातील 20 लोक मध्यरात्री आंबेजोगाईहुन मांगवडगाव या गावी पोहोचले. यावेळी पवार कुटुंबातील तिघांचा पाठलाग करून हत्या करण्यात आली. ज्यांनी या कुटुंबावर हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी पवार कुटुंबातील लोकं पळून जाऊ नये म्हणून अक्षरशः मोटारसायकल फोडल्या अशी माहिती मिळते आहे.
माहितीनुसार, पवार आणि निंबाळकर कुटुंबामध्ये अनेक वर्षांपासून एका जमिनीच्या प्रकरणांमध्ये वाद सुरू आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 2006 मध्ये सुद्धा या प्रकरणांमध्ये पोलीस केसेस झाल्या होत्या. 2018 आणि 2019 मध्ये सुद्धा पोलिसांनी यातील आरोपी विरोधांमध्ये कारवाई केली होती.
बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या प्रकरणात 17 जणांना अटक केली आहे.
——————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज