टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्र बोर्डाचे दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर लवकर निकाल लागेल अशी आशा विद्यार्थ्यांना आहे. दरम्यान 14 तारखेला निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आज निकाल लागणार नसल्याचे महाराष्ट्र बोर्डानं जाहीर केले आहे. अद्याप निकाल कधी लागणार याची अंतिम तारखा जाहीर करण्यात आल्या नाही आहेत.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधी 10वी-12वीचे निकाल हे 15 ते 20 जुलै दरम्यान लागण्याची शक्यता असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळं 12वीचे निकाल 20 जुलैच्या आधी लागण्याची शक्यता आहे.
हे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
या वर्षी इयत्ता बारावीच्या 13 लाखहून अधिक तर दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावीचे निकाल 15 जुलै तर दहावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती मिळत आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे.
तर, कोरोनामुळे 23 मार्च रोजी होणार दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला असून अन्य विषयांच्या सरासरी गुणांच्या आधारावर या विषयाचे मार्क दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे 11 वीच्या प्रेवशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 15 जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून निकाल लागल्यानंतर महविद्यालय निवड प्रक्रिया करता येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
The result of 12th class will be announced on this date, the board clarified
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज