टीम मंगळवेढा टाईम्स ।
सरकारकडे आजची रात्र आहे. त्यांनी विचार करावा, अन्यथा येत्या 20 तारखेला स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरु करेल. आता मेलो तरी मागे हटणार नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात शांतता रॅली काढली. आज या रॅलीचा छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील क्रांतीचौकात मनोज जरांगे यांची रॅली पोहचली असून त्यांना मोठा हार क्रेनच्या साह्याने घालण्यात आला आहे. यानंतर त्यांनी रॅलीतील मराठा समाजबांधवांना संबोधित केले.
सरकारच्या हातात आजची रात्र
जरांगे पाटील म्हणाले, कोपर्डीच्या ताईला अजूनही न्याय मिळालेला नाही. काहीही झाले तरी मराठे न्याय देणारच. देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीवाल्यांनो आता पडणार की नाही सरकार अशा शब्दात त्यांनी दोन्ही पक्षाला आव्हान दिले.
त्यांना आपल्या वेदना कळणार नाही. आज एक महिना झाला सरकारने वेळ मागितला होता. आजची रात्र सरकारच्या हातात आहे.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे. सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, मराठा समाजाच्या आंदोलकांवरील केसेस मागे घ्याव्या. आमच्या एकूण नऊ मागण्या आहे.
288 उमेदवार पाडणार
जरांगे पाटील म्हणाले, 288 उमेदवार पाडल्याशिवाय राहणार नाही. सरकारला जाहीर सांगतो की, आमच्या नऊ मागण्या पूर्ण करा. राज्यात एकूण पाच टप्पे आहेत.
आज पहिल्या टप्प्याचा समारोप आहे. मी अन्न-पाण्याचा विचार केला नाही. आम्ही कट्टर आहोत. सरकारने छगन भुजबळांच्या नादी लागू नये. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मी सांगतो की, मराठे मुंबईपर्यंत पोहचू शकतात.
ओबीसीतून आरक्षण द्या
जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे, समाजाने शांत राहावे, मी समाजाचा मुलगा आहे. सरकारच्या हातात आज रात्र आहे , त्यामुळे सरकारने विचार करावा.
मला राजकारणात जायचे नाही पण आमचा आग्रह एवढाच आहे की, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. आम्हाला तुमच्या राजकारणाशी घेणे देणे नाही.
जर आज रात्रीतून आरक्षण नाही दिले तर मी 20 तारखेला स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरु करतोय. आता मेलो तरी मागे हटणार नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.
मुंबईला स्वारी, तारीख घोषित करणार
जरांगे पाटील म्हणाले, उपोषण सुरु झाल्यानंतर मुंबईची तारीख कधी घोषित करायची मुंबईला कधी जायचे हे आपण ठरवू. 288 उमेदवार पाडायचे की, उभे करायचे हे मी ठरवणार आहे. समाजाचा रक्त पिणारी पैदास माझी नाही. सरकार आपल्यावर डाव टाकत आहेत, त्यामुळे मला आणखी डाव टाकू द्या असे समाजाला त्यांनी आवाहन केले.
जालना रस्ता बंद
आज सकाळी 11 वाजेपासून छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोड बंद करण्यात आला आहे. तसेच या रॅलीमुळे कारागृह शिपाई भरती रद्द करण्यात आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज