टीम मंगळवेढा टाईम्स।
कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनातर्फे ५० हजार रूपयांची मदत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.
त्यानुसार मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांनी आवश्यक कागदपत्रासह सेतू, ग्रामपंचायत येथून अर्ज करावेत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दि.११ सप्टेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार महाराष्ट्र राज्यात कोविड -१९ या आजाराने निधन झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास पन्नास हजार रूपये इतका मदतनिधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करावा
अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन जोडणे गरजेचे आहे. अर्जदाराने आपण स्वतः ऑनलाईन अर्ज करावा.
सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत सीएससी-एसपीव्ही मधून अर्ज करावा
आपल्याला माहिती नसेल तर जवळच्या सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत सीएससी-एसपीव्ही मधून अर्ज करावा.
अर्जदाराचा स्वतःचा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक , अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील , मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील,
“ही” कागदपत्रे बंधनकारक
मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र , इतर निकट नातेवाईकांचे ना- हरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे बंधनकारक आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज