टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी पाणीप्रश्न सोलापूर, इंदापूर व्हाया बारामतीपर्यंत पेटला आहे. यामागे बारामतीची शक्ती कार्यरत असल्याची चर्चा आहे.
लोकसभेची गणिते अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मामांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बारामती परिवाराकडून उजनीचे पाणी नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची कुजबुज जोर धरत आहे.
हक्काचं पाणी नेऊ देणार नाही, असे येथील लोकप्रतिनिधी म्हणताहेत. आंदोलनाची भाषा करताहेत. पालकमंत्र्यांना बदलण्याची मागणी काहींनी केली आहे.
ही मागणी जोर धरली असून, पालकमंत्री बदलण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेते सांगताहेत. पालकमंत्री बदलल्याने पाणीप्रश्न सुटणार असेल तर निश्चित बदला.
बारामतीच्या बुद्धी आणि शक्तीपुढे तसे होणे अपेक्षित नाही. त्यामुळे पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे लाकडी निंबोडी या उपसा सिंचन योजनेला कायमस्वरूपी स्थगिती देणार का, असा सवाल दबक्या आवाजात सोलापूरकर करताहेत.
विशेष म्हणजे, यात राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज