टीम मंगळवेढा टाईम्स।
शासनाने जाहीर केलेल्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची प्रशासनाची जबाबदारी असते, नागरिकांना कमी वेळेत एकाच छताखाली सर्व विभाग एकत्रं आणून योजनांचा लाभ गतिमान पद्धतीने देण्यासाठी
“शासन आपल्या दारी”ही मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांना कमी वेळेत विविध योजनांचा लाभ गतिमान करण्यासाठीचं “शासन आपल्या दारी मोहीम” असल्याचे मतं जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग तालुका पंढरपूर यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिसानिमित्त सेवा पंधरवाडा या कार्यक्रमांतर्गत “शासन आपल्या दारी” उपक्रमाचे आयोजन करकंब येथील वडार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
या उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे मा आ. प्रशांतराव परिचारक, पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या उपस्थतीमध्ये पार पडला.
सुरुवातीस भारत मातेची प्रतिमा व कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे, मा. जि. प.सदस्य बाळासाहेब देशमुख, भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग जिल्हा संयोजक प्रशांत सापनेकर, विरोधी पक्षनेते राहुल काका पूरवत,रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार व्यवहारे, ग्रा.पं. सदस्य संतोष धोत्रे ,बापू शिंदे, बाळू हराळे ,सुनील मोहिते, मुस्तफा बागवान,
राजेंद्र करपे,प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष उमेश गोडसे ,शहराध्यक्ष महेंद्र लोंढे बजरंग दलाचे बाळासाहेब धोत्रे ,माऊली पवार, अक्षय धोत्रे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, संजय मोहिते, परमेश्वर धोत्रे, केरबा पवार, बंडू धोत्रे अनिल राखुंडे, विजय नलवडे औदुंबर कुंभार, अजित धतींगे, किरण काळे,
संतोष टकले, विजयमामा माळी, सलीम बागवान, अरुण बनकर, रामेश्वर खाडे ,सतीश खारे, अंकुश खारे लक्ष्मण व्यवहारे ,राजाराम कोरके दत्ता कदम, विकास घाटुळे, रामदास माने, बाळासाहेब गुळमे, संजय शेटे, जयंत टकले, मन्ना बागवान तसेच महसूल विभागातील अधिकारी, भाजपाचे पदाधिकारी, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी ,कार्यकर्ते ,बहुसंख्य ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना परिचारक म्हणाले,नागरिकांना सरकारी योजना व कागदपत्रे एकाचं ठिकाणी उपलब्ध करून देणे हे “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचा उद्देश आहे. “शासन आपल्या दारी” या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. नागरिकांना प्रत्येक योजनाचा पुरेपूर लाभ मिळावा. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, आलेल्या नागरिकांना योजनांची माहिती द्यावी. त्यांना येणाऱ्या अडचणींना सोडवण्याचे प्रयत्न करावेत. असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामीण विकासविभाग पंढरपूर तालुका संयोजक मनोज पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नववर्षाच्या कालखंडामध्येशेतकरी ,शेतमजूर, कामगार, महिला, व युवक आणि सर्वसामान्य वर्ग केंद्रबिंदू मानून केलेल्या विकास कामाच्या संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भिमा व्यवहारे व आभार लक्ष्मण कुंभार सर यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज