टीम मंगळवेढा टाईम्स ।
होलार समाजातील मयत नागेश नाथा हेगडे याचा मृत्यू अत्यंत दुर्देवी आहे, गेल्या दहा दिवसापासून हेगडे कुटुंब व होलार समाजातील पदाधिकारी न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.
मात्र त्यांना अपेक्षित असा न्याय मिळत नसल्याने मी स्वतः राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे -पाटील यांना भेटून हेगडे कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते भगीरथ भालके यांनी सांगितले.
नंदुर येथील नागेश हेगडे यांच्या मृत्यू घटनेबाबत कुटुंबाची भेट घेतली असता विचारपूस करून आधार व धीर देत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी कुटुंबाचे सांत्वन केले.
मयत नागेश हेगडे यांच्या मृत्यू घटनेबाबत कुटुंब व समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपेक्षित असे यश मिळाले नाही.
सध्याची परिस्थिती पाहता हा समाज लोकशाही मार्गाने न्याय मागतोय, लोकडाऊन उठताच हा समाज उपोषण करण्याचा इशाराही दिला असला तरी हेगडे कुटुंबाला न्याय मिळावा.
या घटनेच्या संबंधित असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याबाबत केलेली मागणी चौकशीअंती पूर्ण व्हावी.
यासाठी मी स्वतः महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे भालके यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच श्रीमंत म्हेत्रे, होलार समाजाचे नेते हैदर कैंगार, तालुका अध्यक्ष शिवाजी केंगार, माजी सरपंच रतीलाल केंगार,प्राचार्य मधुकर भंडगे ,जिल्हा उपाध्यक्ष किसन भजनावळे,सरचिटणीस राजू भंडगे, चिमाजी हेगडे ,मालिकार्जुन बगले,अजित यादव,काका डोंगरे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज