टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्यात उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांसह बालकांच्या घशाला पाण्याअभावी कोरड पडत असल्याने
पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका 8 वर्षीय मुलीचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान या घटनेची पोलीसात नोंद झाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.29 रोजी दुपारी 2.35 वाजता यातील मयत तनिष्का आप्पासो चव्हाण (वय 8 वर्षे) दामाजी कारखाना रोडवर असलेल्या किरण दत्तू यांच्या शेततळ्यावर पाणी पिण्यासाठी गेली असता
ती पाय घसरुन पाण्यात पडून बुडून मयत झाली असल्याची खबर विठ्ठल जाधव यांनी पोलीसात दिली असून याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान पाण्यासाठी मंगळवेढ्यात पहिला बालिकेचा बळी गेल्याने या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज