समाधान फुगारे । 7588214814
कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांच्या समर्थनात उद्या मंगळवेढा बंद
कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या बंदला मंगळवेढा येथील व्यापारी महासंघानी पाठिंबा जाहीर केला आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी आज या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे.
उद्याचा बंद हा वेगळ्या प्रकारचा बंद आहे.यात राजकीय पक्षांचा सहभाग असला तरी हा राजकीय बंद नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या वा संघटनेच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हा बंद नाही.
देशातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा. गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर थंडी, वारे व सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता जे शेतकरी बांधव बसले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा बंद आहे.
लॉकडाऊनच्या काळात सगळे घरात बसलेलो असताना एकटा शेतकरी राजा राबत होता. आज त्यांनी आपल्याला साद घातलीय. त्याला गरज आहे. त्यावेळी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. त्यामुळं हा जनतेनं स्वेच्छेनं बंदमध्ये सहभागी व्हावं व बळीराजाच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी,’ असं आवाहन अनेक सामाजिक संघटना व विविध पक्षांनी केलं आहे.
केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी देशातील विविध सरकारांना लिहिलेल्या एका पत्रावरून भाजपनं सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला घेरलं आहे. या पत्रात पवार यांनी खासगीकरणाची गरज व्यक्त केली होती, असं सांगण्यात येत आहे.
त्याबाबत संजय राऊत यांनी भाष्य केलं. ‘२०१० ची परिस्थिती वेगळी असेल, आताची वेगळी आहे. त्याबद्दल स्वत: पवार साहेब सांगतील. ते देशातले कृषी क्षेत्रातील मोठे तज्ज्ञ व शेतकरी नेते आहेत.
शेवटी शेतकरी नेता हा शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत असतो. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले असताना कोणताही नेता त्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही,’ असं राऊत म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज