टीम मंगळवेढा टाईम्स । नीरा नदीच्या खोऱ्यातील 4 ही धरणे 95 टक्के पर्यंत भरलेली आहेत. त्यामुळे पाऊस ओसरला असला तरीही संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी वीर धरणातून पाणी सोडण्यास परत सुरुवात केली आहे.
गुरुवारी सकाळी 6 वाजता वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग 13 हजार 911 क्यूसेक्स पर्यंत वाढवला आहे. Good news for farmers! Satisfactory increase in Ujani water
दरम्यान उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात रात्रीत सुमारे दोन टक्क्यांची वाढ झाली असून सकाळी 6 वाजता हा साठा 64.45 टक्के एवढा समाधानकारक वाढला आहे.
पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला तरीही पाण्याची आवक कायम असून गुरूवारी सकाळी बंडगार्डन येथील येणारा विसर्ग 13 हजार 830 क्यूसेक्स एवढा तर दौंड येथे हाच विसर्ग 11 हजार 645 क्यूसेक्स इतका आहे.
बुधवारी दिवसभरात उजनी धरणातील सुमारे 3 टक्के पाणी साठा वधारला आहे. तर रात्रीत पुन्हा 2 टक्के वाढ झाली आहे. उजनी धरण आता 65 टक्केच्या घरात गेले आहे.
दरम्यान , वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात येणारा दोन दिवस बंद होत मात्र बुधवारी सायंकाळी विसर्ग पुन्हा सुरू करून तो 5 हजार 9 क्यूसेक्स करन्यात आला आहे. त्यात गुरुवारी सकाळी 6 वाजता आणखी वाढ केली असून 13 हजार 911 क्यूसेक्स एवढा करण्यात आलेला आहे.
वीर , भाटघर , नीरा देवघर , गुंजवणी या चारही धरणातील पाणीसाठा 95 टक्केच्या वर झाला आहे. पावसाचे प्रमाण पाहता वीर मधून पुन्हा पाणी सोडले जाऊ शकते अशी शक्यता नीरा उजवा कालवा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज