टीम मंगळवेढा टाईम्स ।
आ.समाधान आवताडे यांनी गेल्या सहा वर्षात दामाजी हडप करण्याच्या दृष्टीने कारभार केला. सभासदांना, कामगारांना हीनपणाची वागणूक दिली. त्याचा दामाजी कारखान्याच्या असणाऱ्या २६५ एकर जमिनीवर डोळा असून
या निवडणूकीत जागरूकपणे मतदान न केल्यास दामाजीचे नाव पुसून आवताडे अँड कंपनीचे नाव लागेल म्हणून अशा प्रवृत्तीचा सभासद शेतकऱ्यांनी चोख बंदोबस्त करण्याचे या निवडणुकीत ठरवले आसल्याने आ.समाधान आवताडे याच्या पॅनलचा पराभव अटळ आहे असा घणाघात माजी सभापती अँड.नंदकुमार पवार यांनी केला.
समविचारी आघाडी पॅनलच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे प्रा शिवाजीराव काळूगे हे होते.
यावेळी व्यासपीठावर दामोदर देशमुख,रामकृष्ण नागणे, शिवाजीराव काळुंगे,यादाप्पा माळी शिवानंद पाटील,अजित जगताप, पांडुरंग चौगुले,तानाजी खरात,रामचंद्र वाकडे,मुरलीधर दत्तू,
अजित जगताप, गौरीशंकर बुरुकुल,गोपाळ भगरे, नितीन नकाते, राजेंद्र पाटील, संजय पाटील, भारत पाटील,बसवराज पाटील,तानाजी काकडे,रमेश भांजे,पांडुरंग भाकरे,चंद्रशेखर कौडूभैरी,
सोमनाथ माळी,पी.बी.पाटील, भारत बेदरे , औदुंबर वाडदेकर राजेद्र पाटील,अशोक चौंडे,सुरेश कोळेकर आदीसह कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अॅड पवार म्हणाले की आम्ही दामाजीवरील सत्ता सोडताना साखर गॅस मोलॅसिस अशी जवळपास ११५ कोटी रुपयांची मालमत्ता शिल्लक होती तरीही आवताडे यांनी कारखान्यात कोणताही विकास कामे न राबवता तब्बल २०० कोटी चे कर्ज करून ठेवले आहे.
विद्यमान सत्ताधाऱ्यांनी १ लाख ३० हजार पोती परस्पर बाजारात विकली,आम्ही १४ हजार ५०० सभासद वाढवले त्यांनी मात्र १९ हजार ५०० सभासद कमी करण्याचा प्रयत्न केला तो आम्ही उधळून लावला,
तरीही त्यांनी अडीच हजार सभासद कमी केले व अडीच हजार नवीन सोयीने सभासद केले आ.आवताडे यांचा कारखान्याच्या २६५ एकर जमिनीवर डोळा आहे.
आसवानी प्रकल्प पूजनासाठी ८० लाख व कोरोना काळात किट तीन हजार किट वाटून २० हजार किट वाटल्याचे सांगून ८९ लाख हडपले असून त्यानी विकास न करता भ्रष्ट पद्धतीने कारभार केला आहे.
झेडपीचे माजी सभापती
शिवानंद पाटील म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी १९ हजार ५०० सभासदाला आपत्र करण्याचा डाव रचला होता. मात्र तो फसला आहे . सर्वसामान्य सभासद शेतकरी हा कारखान्याचा मालक असून आम्ही सत्तेत आल्याबरोबर सर्वांना सभासद खुले करणार आहोत.
२८ हजार सभासद हेच कारखान्याचे मालक राहतील. कारखाना वाचवण्यासाठी ही शेवटची संधी असून सभासदानी जागरूकपणे मतदान करून समविचारी पॅनलला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप म्हणाले की आ आवताडे यांनी कर्जाचा डोंगर उभा केला असताना त्यांचे काही बगलबच्चे कर्ज फेडल्याबाबत बाता मारत आहेत.
आ.आवताडेच्या राजकीय शाळेत केवळ लबाडीचे ट्रेनिंग दिले जात आहे असे म्हणाले.
बळीराजा पतसंस्थेचे अध्यक्ष दामोदर देशमुख म्हणाले की सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या कोणते आश्वासनाची पूर्ती केली नाही कारखाना कर्जमुक्त करू म्हणणाऱ्यानी कारखान्यावर कोट्यावधी रुपयाचे कर्ज केले. सत्ताबदल झाल्यास समविचारी गटाच्या माध्यमातून कारखान्यासाठी १४ कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी दिले
प्रा शिवाजीराव काळूगे म्हणाले, कर्जमुक्त आसलेला दामाजी कारखाना २० कारखान्याएवढा उद्योग असणाऱ्या आ समाधान आवताडे यांनी कर्जबाजारी करून ठेवला.
२८ हजार सभासदाच्या मालकीची सहकारी संस्था अबाधित राहावी यासाठी पक्षीय मतभेद विसरून समविचारी आघाडी करून निवडणूक लढविली जात आहे. सभासदांनी मोठ्या अपेक्षेने सत्ता दिली मात्र आ आवताडे यांना संधीचे सोने करता आले नाही त्यामुळे कारखान्याची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
पैशाच्या जीवावर निवडणूका जिंकता येतात हे खुळ आ समाधान आवताडे यांच्या डोक्यात आहे ते खूळ कायमचे काढून टाकण्यासाठी स्वाभिमानी मतदारांनी आ आवताडे पॅनलचा विक्रमी मतांनी पराभव करून धडा शिकवावा असे आवाहन पैलवान अशोक चौंडे यांनी केले.
आ आवताडे यांनी कारखान्यात साखर
उतारा जाणीवपूर्वक कमी दाखवल्याने बेहिशोबी साखरेतुन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. एवढी हेराफेरी करूनही सभासदांची दिशाभूल करून सत्ता मिळविण्याचा त्यांचा डाव आहे.
मात्र, अशा सहकारद्वेषी लोकांचा सभासदानी सहा वर्षे कारभार पहिला असून पुन्हा त्यांच्या हाती कारखान्याची सूत्रे गेल्यास कारखाना व ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतील. म्हणून अशा प्रवृत्तींचा सभासद शेतकऱ्यानी बंदोबस्त करावा, असे आवाहन अजित जगताप यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज