टीम मंगळवेढा टाईम्स ।
ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन जणांचे केंद्रीय पथक सोमवारी रात्री सोलापूर दौऱ्यावर आले आहे. आज मंगळवारी दिवसभर हे पथक मोहोळ, पंढरपूर,मंगळवेढा व सांगोल्यातील काही ठिकाणी भेटी देऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.
ऑक्टोबरमध्ये सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये भीमा, सीना व नीरा नद्यांना महापूर आल्यामुळे नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर , मोहोळ, मंगळवेढा, सांगोला ,माळशिरस तालुक्यात अतिवृष्टीने शेती पाण्यात गेली व त्याचबरोबर महापूर व घरांची पडझडीमुळे नुकसान झाले.
नुकसानीची आकडेवारी यापूर्वीच राज्य शासनाला सादर झाली आहे व त्यानुसार शासनाने मदत जाहीर केली. पण ही मदत तोकडी असल्याने राज्य शासनाने केंद्राकडे व बोट दाखविले होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर दौयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकसानीबाबत पत्र दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर अडीच महिन्यांनी केंद्र सरकारने नुकसानीची पाहणी करण्यासाठी पथक पाठविले आहे.
हे पथकसोमवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. रात्री पथकातील अधिकारी सोलापुरी मुक्कामी आले. आज मंगळवारी सकाळी हे पथक नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर निघणार आहे.
दोन महिन्यांनंतर हायवे वरील गावांची होणार तपासणी
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल दोन महिन्यानंतर केंद्रांच्या पथकाला जाग आली आहे. सांगोला तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आज मंगळवारी सांगोल्यात येणार आहे.
धक्कादायक बाब म्हणजे केंद्राचे पथक नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याऐवजी हायवेवर असणाऱ्या गावांची पाहणी दौरा करणार असल्याने नुकसान झालेल्या गावातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पाऊलखुणा दाखविणार
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पथकाला कल्पना येण्यासाठी काही ठिकाणे दाखविण्याचे कृषी विभागाने निश्चित केले आहे. यामध्ये शेतात पाणी साचल्याने झालेला पिकांवर परिणाम , रब्बीच्या पेरणीला झालेला विलंब याची माहिती दिली जाणार आहे. (लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज