मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्णयानुसार , मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती विजेसाठीचे दर ५ ते ७ टक्यांनी कमी होणार आहेत तर शेतीसाठीचे वीज दर १ टक्का कमी होणार आहेत.
मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर ७ ते ८ टक्क्यांनी तर व्यवसायासाठीचे वीज दर ८ ते ९ टक्क्यांनी आणि घरगती विजेचे दर १ ते २ टक्क्यांनी कमी होतील . मुंबईत बऱ्याच मोठ्या भागात टाटा आणि अदानी या कंपन्या वीज वितरण करतात . त्यांच्यासाठीही आयोगाने वीज दर कपात सुचविली | आहे . त्यानुसार या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर १८ ते २० टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर १९ ते २० टक्क्यांनी आणि घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल १० ते ११ टक्क्यांनी कमी होणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज