मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढयातील नागरिकांच्या वतीने सांगली येथील पुरग्रस्तांना मदत म्हणून दहा हजार चपाती,पाच हजार भाकरी,शंभर बिस्कीट बॉक्स,पन्नास पाणी बॉक्स भरलेला टेम्पो सांगलीकडे पाठविण्यात आला आहे.
कृष्णेला आलेल्या पुरामुळे अवघं जीणं जलमय झालेल्या सांगलीकरांना मदतीची गरज होती..ते जगणं असं झालंय की, मदतीची हाक देण्याचे त्राण कुणात नाहीत..पाण्याशी संघर्ष करण्यातच सांगलीकरांचा दिवस अन् रात्र जातेय..सर्वत्र दिसणाºया अन् अथांग पसरलेल्या पाण्याने भयभीत झालेल्या महिला, मुलं अन् रूग्णशय्येवर पडलेल्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचं तर मोठं आव्हानच होतं..संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी आपला हात पुढं करणं हा तर मंगळवेढेकरांचा धर्म हा धर्म मंगळवेढ्यातील वारी परिवार,माजी सैनिक संघटना, व्यापारी संघटना यांनी मोठ्या निष्ठेने पाळला आणि पुरात अडकलेल्या नागरिकांना जेवणासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्व साहित्यासह टेंपो पाठवला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सोमनाथ आवताडे,नगरसेवक अजित जगताप,डॉ.सतीश शिर्के,सोमनाथ माळी, दत्तात्रय लाळे,सतीश हजारे,सतीश दत्तू, सत्यजित सुरवसे,माजी सैनिक चंगेजखान इनामदार,अँड.दत्तात्रय तोडकरी, माजी नगरसेवक अरूण किल्लेदार,नगरसेवक बशीरभाई बागवान,अनिल बोदाडे,स्वप्निल फुगारे,मेजर दिवसे,मुरलीधर घुले यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज