मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाची साथ पसरल्यानंतर असंख्य लोक शहरांतून गावाकडे परतले आहेत . त्यामुळे यापुढील काळात देशाच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका निर्माण झाला आहे , असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ( आयएमसीआर ) माजी संचालिका असलेल्या डॉ आहेत . कोरोनाने भयभीत झालेले असंख्य लोक शहरातन खेड्यात स्थलांतरित झाले आहेत . आता त्यांच्याबरोबर कोरोनाची साथ ग्रामीण भारतात मोठ्या प्रमाणावर फैलावण्याची चिन्हे आहे.
त्या संकटाला तोंड देण्यासाठी देशाने आता सज्ज राहायला हवे . कोरोनाचा विषाणू वय , धर्म , देशाच्या सीमा असे काही जाणत नाही . त्यामुळे त्याच्या विरोधात एकजुटीनेच मुकाबला करायला हवा . भारताने लघु , मध्यम व दीर्घकालावधीचा कार्यक्रम आखणे आवश्यक आहे. भारतामध्ये वैद्यकीय उपकरणांची संख्या पुरेशी नाही , असेही त्यांनी म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज