मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । कोरोनाशी लढा तर आपण देऊच ; पण त्यानंतर येणारा काळ आर्थिकदृष्टीने अत्यंत कठीण राहणार आहे . येणारे दिवस काटकसरीने काढावे लागतील , बचत करावी लागेल , विकासदर दोन टक्क्यांपर्यंत खाली येईल , असे सांगितले जात आहे.
तेव्हा त्यावर कशी मात करायची , याचा आतापासून विचार आणि नियोजन करण्याची गरज आहे , असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा . शरद पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी सोमवारी जनतेशी संवाद साधला.
राज्य सरकार चांगले काम करीत असताना त्यांनी सांगितलेल्या सूचना ऐकल्या पाहिजेत. तशी वेळ आलीच , तर सरकार कठोर कारवाई करायलाही मागेपुढे पाहणार नाही , असेही पवार बोलताना म्हणाले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज