मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी व शेतकऱ्यांनी कारखान्याचे मंदिर वाचवण्याचे काम केले असे मत चेअरमन समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात खेळीमेळीत पार पडली
सुरुवातीस श्री संत दामाजीपंत, कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व।कि।रा।मर्दा व संस्थापक व्हा।चेअरमन स्व।र।शि।शहा यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे व व्हा।चेअरमन अंबादास कुलकर्णी यांचे हस्ते करण्यांत आले। कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण यांनी अहवाल सालात मयत झालेल्या थोर व्यक्ती, संस्थेचे सभासद व कामगार यांच्या श्रध्दांजलीचा ठराव मांडला
समाधान आवताडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, एकही उपपदार्थ नसतांना फक्त साखर उत्पादन करुन एफआरपी २ हजार २२४ शेतकऱ्यांनी आपल्या बरोबरीच्या कारखान्याप्रमाणे स्पर्धात्मक दर दिलेला आहे। कारखान्याच्या वाटचालीमध्ये अनंत अडचणी आल्या परंतु आपणा सर्वांची संस्थेवर असणारी निष्ठा व सहकार्यामुळे त्या अडचणीवर मात करुन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। येथून पुढे फक्त साखर उत्पादन करुन पुढे कारखानदारी टिकणे अवघड आहे म्हणून आपल्या कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाचा भुमीपूजन नुकताच संपन्न झाला असुन या प्रकल्पातुन इथेनाùल, स्पिरीट, अल्कोहोल निर्मिती होवून कारखान्यास अतिरिक्त उत्पन्न सुरु होणार आहे त्यामुळे शेतकÅयांना ऊसास जादा दर देणे, तोडणी वाहतुकदारांचे बील व कामगारांचे पगार वेळेत करणेसाठी निश्चित मदत होणार आहे। हा आसवनी प्रकल्प एका वर्षाच्या आत उभा करणार आहे।
आमचे संचालक मंडळाने कारखान्यावर नवीन शुगर सायलो सिस्टिम सुरु केल्याने साखर हमाली, साखर पोती शिलाई, नंबरींगचे काम यासाठी दरवर्षी होणारा रु। २० ते ३० लाख खर्च वाचणार आहे। तसेच साखरेचे तपमान कमी होवून साखरेचा कलर सुध्दा जास्त दिवस टिकणार आहे। कारखान्यने ३१ वर्षाच्या काळामध्ये अनेक चढ-उतार पाहिले। शेतकरी व कामगारामुळे हे शेतकÅयांचे मंदिर चांगले टिकले। सध्या कारखान्यावर असणारी शेतकÅयांची निष्ठा, सभासदांचा विश्वास व कामगारांचे प्रेम यामुळेच फक्त साखर उत्पादनावर आपला कारखाना चालत आहे। सध्या आपलेकडे जवळपास २ लाख ४० हजार पोती साखर साठा शिल्लक असून शासनाचे धोरणानुसारच साखर विक्री सुरु आहे।
साखरेचे दर कमी असलेने रु। ७४ चे बिल व कामगारांचे पगार करणेस विलंब लागला आहे। सध्या साखरेचे दर बाजारपेठेत टिकून असलेने अनंत अडचणीवर मात करुन शेतकÅयांच्या ऊसाचे बिल रुपये ७४/- व कामगारांचा पगार लवकरच अदा करण्यात येणार आहे। येणाÅया सन २०१९-२० या गाळप हंगामामध्ये चार लाख मे।टन ऊस गाळपाचे उदिदष्ठ पुर्ण करणेसाठी सर्व सभासदांनी आपला संपूर्ण ऊस दामाजीस घालून सहकार्य करावे। आपणांस तालुक्याच्या हिताच्या सर्व गोष्टी विचारात घेवून त्या पूर्ण करावयाच्या असुन कारखान्याची परिस्थिती व शासन धोरण याचा विचार करता वचनाची पुर्तता करणेत येईल।
व्यासपिठावर व्हा।चेअरमन अंबादास कुलकर्णी व सर्व संचालक यांचेसह पंचायत समिती सभापती प्रदिप खांडेकर, शिवसेना तालुका प्रमुख येताळा भगत, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सोमनाथ आवताडे, माजी सभापती भुजंगराव पाटील, माजी संचालक महादेव कोरे, नारायण शिंदे, पंढरपुरचे विनोद लटके, अùड।दत्तात्रय तोडकरी, मार्वेŠट कमिटीचे संचालक दत्तात्रय गायकवाड, भालेवाडीचे सरपंच प्रताप गवळी उपस्थित होते।
संचालक अशोक केदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले। पुढे बोलताना म्हणाले की, कारखान्याची उभारणी स्व।कि।रा।मर्दा उर्फ मारवाडी वकील, स्व।रतनचंद शहा, यांनी केली। चेअरमन सर्व संचालक मंडळ व सर्व सभासदांना समान वागणुक देत आहे। आतापर्यंत आम्ही आमचे मार्गदर्शक चेअरमन मा।समाधानदादा आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली कामकाज करीत असून सध्या कामकाजामध्ये आम्ही अत्यंत काटकसर, पारदर्शकता, चिकाटी ठेवलेली आहे।
कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार लक्ष्मण आसबे यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले। विषयपत्रिकेवरील विषयांना सभासदांनी खेळीमेळीच्या वातावरणात टाळयांच्या गजरात मंजूरी दिली। अतिशय अडचणीतुन मार्ग काढून कारखान्याचे चेअरमन मा।श्री।समाधानदादा आवताडे यांनी अत्यंत काटकसरीने कारभार करुन पैसा उपलब्ध करुन कारखान्याचे कामकाज चांगल्या प्रकारे सुरु आहे। कारखान्याचे सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कार्यकारी संचालक व चेअरमन यांनी समाधानकारक व योग्य अशी दिली। दहा रुपये किलो साखर व आसवनी प्रकल्पाचे भुमीपुजन करुन वचननाम्यातील आश्वासने पूर्ण केलेबद्दल सर्व सभासदांच्या वतीने संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव श्री कुरडे यांनी मांडला व त्यास सर्वांनी मंजुरी दिली।
यावेळी कारखान्याचे संचालक लक्ष्मण एकनाथ जगताप, राजेंद्र दामोदर सुरवसे, राजीव सुब्राव बाबर, शिवयोग्याप्पा सायबण्णा पुजारी, बापू मधुकर काकेकर, बसवेश्वर शंकर पाटील, मारुती लिंगाप्पा थोरबोले, रामकृष्ण जोतीराम चव्हाण, भुजंगराव मारुती आसबे, सुरेश बापू भाकरे, बाळासोा पांडुरंग शिंदे, सचिन गोपाळ शिवशरण, अशोक आण्णाप्पा केदार, सौ।स्मिता प्रमोदकुमार म्हमाणे, सौ। कविता भारत निकम, संजय सुब्राव पवार, विजय धानाप्पा माने, अशोक गुराप्पा माळी, विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन सभासद, शेतकरी, हित्चिंतक, वाहतुक ठेकेदार, पत्रकार, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, सेक्रेटरी भारत मासाळ, कामगार पतसंस्थेचे चेअरमन उत्तम भुसे, व्हाईस चेअरमन रमेश पाटील, हित्चिंतक, तोडणी ठेकेदार, मजूर, ऊस वाहतुक कंत्राटदार आदि उपस्थित होते। सभेकरिता कारखान्याचे प्र।सूरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे यांचे मार्गदर्शनाखाली बंदोबस्त चोख ठेवला होता। सभेमध्ये कोणताही गोंधळ न होता सभा तब्बल दीड तास शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। रात्री पाऊस झालेने प्रशासनाची धांदल उडाली परंतु वेळेत नेटके नियोजन करणेसाठी कारखान्याचे सर्व विभागाचे खातेप्रमुख, उपखातेप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी अतिशय परिश्रम घेतले। कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज