मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील इंगळे गल्ली परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून गटार ब्लॉक झाल्याने गटारी मधून पाणी रस्त्यावर आले आहे. हे पाणी रस्त्यावर आल्याने डबके साचले आहे. त्यामुळे या पाण्यातून नागरिकांना रहदारी करत ये-जा करावी लागत असून स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र मुख्याधिकारी व स्थानिक पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
आमच्या परिसरात गाटारीचे पाणी रस्त्यावर येत असून याबाबत न.पा प्रशासनास लेखी तक्रार देऊन ही दखल घेतली जात नाही.गटारीचे केलेले काम निकृष्ट व चुकीचे आहे. :- आनंद इंगळे,तक्रारदार,मंगळवेढा
गटारींची वेळोवेळी सफाई होत नाही. सांडपाण्याचा निचरा होत आहे. परिणामी गटारी साचून राहतात त्यामुळे दुर्गंधी पसरून डास,मच्छर आदींची उत्पत्ती होत असल्याने साथीचे आजार वाढीस लागून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे.प्रभाग क्रमांक २ व ५ मधील भागात स्वच्छतेचे धिंडवडे निघाले असून इंगळे गल्लीत गटारीत तुडुंब भरल्याने गटारीचे पाणी पार रस्त्यावर साचू लागले आहे.आशा दुर्गंधीयुक्त पाण्यातून लहान मुले महिला वयोवृद्धांना मार्गक्रमण करावे लागत आहे. तर काहींच्या घरात गटारीचे पाणी शिरत आहे.
यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.वारंवार समस्या मांडली नगरपालिका प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.याबाबत यापूर्वीच अनेक वेळा नगरपालिका प्रशासनास सूचना देऊन व लेखी तक्रार करून सुद्धा याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. नगरपालिकेचे कामकाज निष्क्रिय ठरल्याने अशा प्रकाराला सामोरे जावे लागत आहे.दररोज येथे गटारीचे पाणी तुंबून राहत असल्याने रोगराई पसरण्याची भीती आहे.तरीही याकडे दुर्लक्ष करत आहेत हीच शोकांतिका असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
दरम्यान प्रभाग ५ मधील नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांनी या केलेल्या गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे असून या गटारीचे काम दुसऱ्यांदा करण्यात यावे, सदर गटाराचे काम पूर्ण झाल्याशिवाय संबंधित ठेकेदारास वेतन अदा करू नये असे पत्र मुख्याधिकारी यांना दिले आहे.तरीसुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील इंगळे गल्ली परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून गटार ब्लॉक झाल्याने गटारी मधून पाणी रस्त्यावर आले आहे. हे पाणी रस्त्यावर आल्याने डबके साचले आहे. त्यामुळे या पाण्यातून नागरिकांना रहदारी करत ये-जा करावी लागत असून स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र मुख्याधिकारी व स्थानिक पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
आमच्या परिसरात गाटारीचे पाणी रस्त्यावर येत असून याबाबत न.पा प्रशासनास लेखी तक्रार देऊन ही दखल घेतली जात नाही.गटारीचे केलेले काम निकृष्ट व चुकीचे आहे. :- आनंद इंगळे,तक्रारदार,मंगळवेढा
गटारींची वेळोवेळी सफाई होत नाही. सांडपाण्याचा निचरा होत आहे. परिणामी गटारी साचून राहतात त्यामुळे दुर्गंधी पसरून डास,मच्छर आदींची उत्पत्ती होत असल्याने साथीचे आजार वाढीस लागून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे.प्रभाग क्रमांक २ व ५ मधील भागात स्वच्छतेचे धिंडवडे निघाले असून इंगळे गल्लीत गटारीत तुडुंब भरल्याने गटारीचे पाणी पार रस्त्यावर साचू लागले आहे.आशा दुर्गंधीयुक्त पाण्यातून लहान मुले महिला वयोवृद्धांना मार्गक्रमण करावे लागत आहे. तर काहींच्या घरात गटारीचे पाणी शिरत आहे.
यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.वारंवार समस्या मांडली नगरपालिका प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.याबाबत यापूर्वीच अनेक वेळा नगरपालिका प्रशासनास सूचना देऊन व लेखी तक्रार करून सुद्धा याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. नगरपालिकेचे कामकाज निष्क्रिय ठरल्याने अशा प्रकाराला सामोरे जावे लागत आहे.दररोज येथे गटारीचे पाणी तुंबून राहत असल्याने रोगराई पसरण्याची भीती आहे.तरीही याकडे दुर्लक्ष करत आहेत हीच शोकांतिका असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
दरम्यान प्रभाग ५ मधील नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांनी या केलेल्या गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे असून या गटारीचे काम दुसऱ्यांदा करण्यात यावे, सदर गटाराचे काम पूर्ण झाल्याशिवाय संबंधित ठेकेदारास वेतन अदा करू नये असे पत्र मुख्याधिकारी यांना दिले आहे.तरीसुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज