टीम मंगळवेढा टाइम्स ।
रत्नागिरी – नागपूर महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा व प्रांताधिकारी आप्पासाहेब समीदंर यांना निलंबित करावे या मागणीसाठी मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर गेल्या १५ दिवसांपासून प्रहारचे उपोषण सुरू आहे.
प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या माजी मंत्री बच्चु कडू यांनी थेट जल्हिाधिकारी मिलींद शंभरकर यांना फोन करून प्रांताधिकारी यांची चांगलीच खरडपट्टी केली.
भूसंपादन मोबदला वाटपाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
रत्नागिरी – नागपूर महामार्गात मंगळवेढा सांगोला तालुक्यातील शेकडो एकर जमिनी गेल्या आहेत. यामध्ये मोबदला देताना महसूल अधिकाऱ्यांनी काझी नामक व्यक्तीने केलेल्या तक्रारीचा बाऊ करून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट केली असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे.
प्रांताधिकारी यांनी केलेल्या गैरव्यवहाराचे कागदोपत्री पुरावे देऊनही जल्हिाधिकारी पाठराखण करीत असल्याची तक्रार प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेबांडे यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली.
जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत माझी भूमिका कायमच असेल असे सद्रिया माळी यांनी सांगितले. यावेळी शेतकरी निलेश कांबळे, नवनाथ शिंदे, अरुण अवताडे, बापू मोहिते, बिरू शिंदे, जगन्नाथ गायकवाड,
अरुण दत्तू, रघु लेंडवे तर प्रहार जनशक्ती पक्षाचे जल्हिा सरचिटणीस श्रीपाद पाटील, तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, रोहिदास कांबळे, संपर्क प्रमुख शकील खाटीक उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज