टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील जनतेला वेठीस धरणाऱ्या आंदोलन कर्त्याचा पोलिसांनी लगाम लावावा अशा मागणीचे निवेदन सर्व पक्षीयांच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील खाद्यपदार्थ द्वारे विषबाधा होऊन दोन लहान मुलीचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी समस्त गावकऱ्यांच्या वतीने व सर्व पक्षीय यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन मरवडे येथे करण्यात आले होते.
यावेळी कर्तव्यदक्ष डीवायएसपी राजश्री पाटील यांनी आरोपींना चार दिवसांमध्ये जेरबंद करण्यात येईल अशी ग्वाही दिली होती.
त्यांनी व त्यांच्या टीमने तीन दिवसांमध्ये आरोपींना गजाआड केले तरीसुद्धा अद्याप पर्यंत डीवायएसपी कार्यालयासमोर प्रभाकर देशमुख यांचे धरणे आंदोलन चालू आहे.
आरोपींना अटक होऊन सुद्धा आंदोलन करून हायवे वरती रस्ता रोको इशारा देऊन विनाकारण मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न चालू आहे.
कोरोनाच्या संकटामुळे रुग्ण संख्या वाढत आहे बाहेरगावचे लोक जमवून धरणे आंदोलन करणे रस्ता रोको चा इशारा देणे हे कोरोनाच्या वाढीला कारणीभूत ठरणार आहे.
यामुळे सर्व पक्षी यांच्या वतीने डीवायएसपी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना भेटून सांगितले. अशा या आंदोलन कर्त्याचा पोलिसांनी लगाम लावावा.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, स्वाभिमानीचे जिल्हा संघटक युवराज घुले,
वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी सरवदे, दलित पॅंथरचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ लोकरे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, वंचितचे नेते लक्ष्मण गायकवाड, अर्जुन मुद्गुल, सिदया माळी, आनंद घुंगे, युवराज टेकाळे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज