टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या निवडणुकीचा खर्च विहित नमुन्यात व निर्धारित वेळेत नियमाप्रमाणे योग्य कायदेशीर असा खर्च दाखल केलेला नाही.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती या तक्रारीनंतर चौकशी झाली सुनावणी झाली या तक्रारीत तथ्य आढळले आहे.
यामुळे या पाच ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व आता रद्द होणार आहे हे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर या सदस्यांना आयुक्तांकडे अपील करण्याची संधी आहे.
मात्र अपील केल्यानंतर एक महिन्याच्या आत निर्णय देण्याची जबाबदारी आयुक्तांचे आहे.
आयुक्तांकडून देखील कायदेशीर निर्णय घेतला जात असताना वस्तुस्थितीला डावलुन व पुरावे डावलून निर्णय होऊ शकणार नाही.
यामुळे साधारण एक ते दीड महिन्यात या सदस्यांना आपल्या सदस्यत्व गमवावे लागणार असून त्याचा जागेसाठी दोन महिन्यानंतर किंवा ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
या निर्णयाबाबत मुंबई उच्च न्यायालयात अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तरतूद नसल्याचे एका ज्येष्ठ वकिलाने स्पष्ट केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज