टीम मंगळवेढा टाईम्स ।
किडनीविकार हा बर्याचदा त्याच्या अंतिम स्तरात पोहचल्यावरच त्याची लक्षणं दिसून येतात. म्हणूनच योग्य वेळी लक्षण जाणा आणि धोका टाळा असे आवाहन मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील किडनी तज्ञ डॉक्टरांनी केले आहे.
किडनीचे विकार हे ‘सायलंट किलर’ असल्याने बर्याचदा अंतिम टप्प्यांत आल्यानंतरच ते रुग्णांच्या लक्षात येतात.
मात्र तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याने अनेकदा किडनीचे विकार जीवावर बेतू शकतात. त्यामुळे वेळोवेळी आपले शरिर आपल्याला देत असलेले संकेत जाणा म्हणजे किडनी विकारावर योग्य उपचार करणे शक्य होईल.
किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहे. हे सर्व विषारी पदार्थ आपल्या मूत्राशयात जातात आणि लघवी करताना बाहेर पडतात.
किडनी फेल्युअरची लक्षणे इतकी सौम्य असतात की हा आजार वाढत नाही तोपर्यंत बहुतेक लोकांना काही फरक जाणवत नाही. अनेक महिला कामाच्या गडबडीत पाणी कमी पितात. तर कधी बराचवेळ लघवी थांबवून ठेवावी लागते यामुळे मुत्राशयाच्या आजारांचा धोका वाढू शकतो.
किडनी विकाराची ही आहेत काही लक्षणे
किडनीचा शेवटच्या टप्प्यात जाण्यापूर्वी प्रत्येक रुग्णांमध्ये काही बदल आढळतात. ही लक्षणे आढळल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास, किडनी फेल हे टाळता येते.
त्यांचे लक्षणे लघवीचा लालसर रंग, हात पाय, तोंडावर येणारी सूज, थकवा येणे, रक्तदाब वाढणे, भूक मंदावणे, उलटी मळमळ होणे, दम लागणे, अंगावरती खाज येणे, हिमोग्लोबिन कमी होणे, लघवी मध्ये फेस तयार होणे, हे किडनी बिघडल्याचे लक्षण आहे.
याकडे दुर्लक्ष केले, किंवा घरगुती पद्धतीचे उपचार करून तज्ञ डॉक्टरांच्या कडे जाणे टाळले तर किडनीला हानी पोहोचू शकते.
🔴 बालकांमध्येही किडनीचे विकार
गेल्या काही वर्षापासून हातपंपाचे पाणी व जंक फूड चे वाढते प्रमाण त्यामुळे बालकांमध्ये किडनीचे विकार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
🔴 आता हिमोडायलेसेस करण्याची सोय आता मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा मल्टीस्पेशल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे त्यामुळे बालकांना हे उपचार नवसंजीवनी देणारे ठरणार आहे
🔴 लहान मुलांचा लघवीचा बदललेला रंग आणि हातपायंसह चेहऱ्यावर आलेली सूज हे किडनी बिघडल्याचे महत्वपूर्ण लक्षण मानले जाते.
किडनी विकार वाढीची कारणे
किडनीचा आजार हा काही वेळा अनुवंशिक असतो. तर तो काही वेळा चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम ही असतो. गेल्या काही वर्षात किडनी रुग्ण वाढण्याचे कारण वेदनानाशक औषधांचे अति सेवन असल्याचे समोर आले आहे.
वेदनानाशक औषधांमध्ये असणारी प्रतिजैविके त्रासदायक असतात. त्यामुळे पॅरासिटॅमॉल घेण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. याबरोबरच वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.
किडनी हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. या अवयवाची निगा राखणे व त्याच्या आजाराची लक्षणे जाणून घेऊन तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. परस्पर कोणतेही औषध घेणे टाळावे. वर्षातून एकदा रक्तदाब व रक्तातील साखर तपासणी अत्यावश्यक आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज