टीम मंगळवेढा टाईम्स।
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन करणारे ऍड गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे.
राज्य बार काऊन्सिल आणि ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्यामुळे दोन वर्ष वकिली करण्यास मज्जाव केला आहे.
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का मिळाला आहे. महाराष्ट्र बार कौन्सिलने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली आहे.
दरम्यान, यापूर्वीच बार कौन्सिलने सदावर्तेंविरोधात सुरू केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता.
तुम्ही वकील आहात म्हणून तुम्हाला विशेष वागणूक मिळणार नाही. तसेच, बार कौन्सिलविरुद्ध काहीही बोलायला मुभा देणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना सुनावलं होतं.
पेशाने वकील असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ॲड.सुशील मंचेकर यांनी याबाबत महाराष्ट्र बार काउंन्सिलकडे तक्रार केली होती.
त्यानंतर गेल्या महिन्यात 7 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बार कौन्सिलने सदावर्तेंविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. यानंतर ही कारवाई राजकीय हेतून प्रेरित असल्याचा दावा करत सदावर्तेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पेशाने वकील असताना गुणरत्न सदावर्ते वकिलांच्या आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन करतात. मीडियासमोर, वादविवाद कार्यक्रमात, सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनादरम्यान ते वकिलाचा बँड परिधान करुन जातात, असं ॲड. सुशील मंचेकर यांनी तक्रारीत म्हटले होते.
त्यानंतर 7 फेब्रुवारीला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रने सदावर्ते यांना नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई सुरू केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज