टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतकऱ्यांचा राजवाडा असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे होणारे चेअरमन अभिजीत पाटील यांचा गट मंगळवेढा सर्व ग्रामीण भागात आता हळूहळू तयार होत आहे.
यासाठी मंगळवेढा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुका अभिजित पाटील समर्थक लढविणार आहेत. या निवडणुका लढवून जिंकण्यासाठी नवीन युवा कार्यकर्त्यांना आपलेसे केले जाणार आहे.
यासाठी साम दाम दंड भेद ही नीती वापरली जाण्याची शक्यता आहे. समाजात सामाजिक कार्य केले असलेल्यांना त्यांच्या वारसांना या निवडणुकीत उमेदवारी देऊन विजयी करण्यासाठी सर्वतो प्रकारची मदत केली जाणार आहे.
यामुळे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर तरुणांसाठी निर्माण झालेली पोकळी आता भगीरथ भालके यांच्याकडे म्हणाव्या त्या पद्धतीने वर्ग झालेली दिसत नाही.
यामुळे या तरुण युवकांना सामाजिक कार्य करण्याची क्षमता तयारी असलेल्या तरुणांना अभिजीत पाटील यांच्याकडून प्रोत्साहित केले जाणार आहे.
यामुळे मंगळवेढा नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीप्रमाणे रंगतदार होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकाकडून व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी विठ्ठलचे चेअरमन असलेले स्व.भारत भालके यांनी मंगळवेढा व शहर ग्रामीण भागात तरुणांना आपलेसे करून घेण्यात यश मिळवले होते.
चांगल्या पद्धतीने तरुण राजकारणी वर्गाला त्यांनी हाताळले होते यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी हॅट्रिक साधली होती.
या पार्श्वभूमीवर आता अभिजीत पाटील यांची वाटचाल चालू झालेली आहे यामुळे मंगळवेढा तालुक्यातील आगामी सर्व निवडणुका अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
तालुक्याच्या राजकारणामध्ये सध्या अवताडे गट आहेत, परिचारक गट आहे, भालके गट आहे याशिवाय वेगवेगळे परिवार आहेत.
यामुळे तालुक्याच्या राजकारणामध्ये आता आणखी एक गट उतरणार असल्यामुळे राजकारण रंगतदार व विधायक विकसनशील होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज