मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मध्यप्रदेशमध्ये मंगळवारी काँग्रेस सरकार अल्पमतात आले असून ते लवकरच कोसळणार हे निश्चित असताना महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
-सोलापुरातील ‘या बँकांचे’ 12 कोटी ‘येस बँकेत’ अडकले!
ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच अनेक नेत्यांची आघाडी सरकारमध्ये कुचंबणा होत आहे. हे नेते त्यांचा पक्ष सोडून भाजपला येऊन मिळतील, असे पाटील यांनी बोलताना सांगितले. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याचा ठामपणे इन्कार करीत भाजप नेत्यांनी स्वप्ने पाहू नयेत, असे स्पष्ट केले.
दरम्यान कर्नाटक,मध्यप्रदेश नंतर भाजपचे मिशन लॉटस पुन्हा सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण महाराष्ट्रात ज्योतिरादित्य कोण हे समजू शकले नाही.
-सोलापूर जिल्हा परिषदेची बजेट सभा लांबणीवर
महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही, सहा महिन्यात ते पडेल, असे दावे भाजप नेत्यांनी केले आहेत. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी गुढीपाडव्यापर्यंत हे सरकार पडेल, असे भाकीत केले आहे.मध्य प्रदेशात काँग्रेस सरकारला हादरा दिल्यावर महाराष्ट्रातही राजकीय भूकंप घडणार का, याविषयी विचारता प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, हे सरकार भाजप पाडणार नाही. तर ते त्यांच्यातील विसंवादामुळे पडेल.
शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सरकार पडण्याची शक्यता फेटाळून लावली. हे सरकार मजबूत व स्थिर आहे, असे स्पष्ट केले.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज