मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा-पंढरपूर आमदार साहेब यांनी नुकतेच प्रसिध्दीपत्रक प्रसिध्दीस देवून पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्यासह त्यांच्या बदलीविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्या समाजसेवकांवर अनेक गंभीर आरोप आपण केलेले आहेत. यामुळे माझ्यासह तमाम नागरिकांच्या मनात खालील प्रश्न उपस्थित होत आहेत.
1) पंढरपूर शहरात अवैध धंदे, वाळू उपसा, खाजगी सावकारी, खंडणी वसूली चालू होती ? असा प्रश्न आपण उपस्थित केला. याबाबत यापुर्वी आपण कधीही आवाज उठविला नाही ? छोट्या-मोठ्या कारणासाठी आपण नेहमीच विधानसभेत प्रश्न उपस्थित करीत असता मग एवढ्या गंभीर प्रश्नावर या अगोदर आपण का बोलला नाही आपण मुग गिळून का गप्प बसलात ?
2) महिलांच्या सुरक्षेविषयी, मुलींच्या छेडछाडीविषयी आपण कधी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्याचे दिसून आले नाही.
3) बंदुकीचा धाक दाखवून लुबाडल्याचे व्हीडीओ फुटेज आपल्याजवळ उपलब्ध आहेत असे आपण म्हटलेले आहे. मग यावर आपण कधी का आवाज उठविला नाही.
4) आमदार साहेब आपण समाजसेवकांवर आरोप करत आहात, परंतू आपल्याच गाडीमध्ये फिरणारा व आपले सर्व कामकाज पाहणारा अत्यंत जवळचा वाळू तस्करीचे बक्कळ गुन्हे दाखल असलेला आपला कार्यकर्ता गुन्हे करीत असताना आपण इतरांवर चिखलफेक करणे चुकीचे आहे.
5) पंढरपूर शहरातील एका व्यक्तीवर गांजा विक्री करीत असलेबाबतची कारवाई कोल्हापूर पोलीसांनी पंढरपुरात येवून केल्याचे आपण सांगितले मात्र त्यावर आपण कधी आवाज उठविला नाही ते आत्ताच कसे काय सुचले ?
6) सागोंलामधुन माजी आमदार गणपतआबा देशमुख आणी दिपक आबा साळुंखे यानीं बोलावुन घेऊन पो.नि.दयानंद गावडे यांच्याकडून अर्ज लिहुन घेतला आणि त्यांना सोलापुरला का पाठवलं ? ते संपूर्ण सांगोला तालुक्याला महित आहे. उलट मला हे सिंघम भेटायला आल्यावर मी लगेच पंढरपूरसाठी शिफारस दिली असे सांगितले मग आताच त्यांच्यावर आरोप करण्याची वेळ आपल्यावर का आली ?
7) ज्यांची बदली झाली त्यांच्या कार्यकाळात शहरात अवैध धंदे वाढले होते, कायदा सुव्यवस्था धोक्यात आली होती असे आपण म्हणालात त्यावर आपण का आवाज उठविला नाही आपण गप्प का बसला ? याचा खुलासा करावा.
8) राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यास परवानगी देतानाही दुजाभाव केला जात होता असे आपण प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हटलेले आहे पण असे कुठल्याही समाज बांधवांने आजपर्यंत म्हटलेले नाही व आम्ही ऐकीवात नाही. मग आपण याबाबत शांत का बसला ?
9) सामान्य जनतेला सिंघमच्या बदलीचे दुःख नाही तर त्यांनी पोसलेल्या विकाऊ समाज सेवकांना कळवळा आलेला आहे असा आरोप आपण केला मात्र आपण पोसलेले वाळूमाफीया, खाजगी सावकार यांच्यावर कारवाई करू नका असे आपल्याच गाडीत फिरणाऱ्या आपल्या जिवलग कार्यकर्त्याचे मोबाईल रेकॉर्डींग तपासणे आवश्यक आहे. ते करण्याचे धाडस आपण दाखवाल का ?
10) आमदारसाहेब आपण प्रशासकीय बदली झाली असे पत्रक काढले असता सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी वृत्तपत्रात जाहीर खुलासा करून बदली झाली नसल्याचे सांगितलेले आहे. यावर आपण खुलासा कराल का ?
11) पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व शासकीय ऑफीसला प्रत्येक महिन्याला आपला जिवलग कार्यकर्ता (सुस्तेचा) कशासाठी जातो ? तो कशासाठी फोन लावून देतो ? याचा खुलासा आपण कराल का ?
12) पंढरपूर तालुक्यातील सरकोली, अजनसोंड, मुंढेवाडी येथील वाळू उपसा करणारे यादी आपण जाहीर कराल का ?
या प्रश्नांची उत्तरे आपण श्री विठ्ठलाला साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर द्याल जनतेला द्याल का ? असा प्रश्न बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी उपस्थित केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज