मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रशासन अधिकारी बसवेश्वर स्वामी यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्याचे ग्राम विकास मंत्री ना. हसन मुश्रीफ याच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार ग्राम विकास व महसूल राज्य मंत्री ना. अब्दुल सत्तार, अरविंद कुमार अतिरीक्त मुख्य सचिव ग्राम विकास, गिरीष भालेराव उपसचिव ग्राम विकास विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी यांना सहकुटुंब प्रदान करण्यात आला.
प्रतिवर्षी राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत उल्लेखनिय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवंत अधिकारी व कर्मचारी या पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०१८-१९ या वर्षासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागात कार्यरत बसवेश्वर स्वामी यांना हा पुरस्कार जाहिर झाला. दि.१२ मार्च रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात माजी मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनी पुरस्कार वितरणाचा सोहळा मोठया थाटामाटात पार पडला.
यावेळी बसवेश्वर स्वामी यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी,दोन्ही मुले पुरस्कार स्विकारण्यासाठी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमाकांत साळुंखे, सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेश सोनवणे व समाज कल्याण विभागातील शशीकांत ढेकळे हे उपस्थित होते.
बसवेश्वर स्वामी हे १९९७ साली जिल्हा परिषद सेवेत वरिष्ठ सहाय्यक पदावर रुजू झाले.२३ वर्षाच्या प्रदीर्ध सेवेत त्यांनी पंचायत समिती सांगोला, बालकल्याण विभाग पंचायत समिती सांगोला, कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती अक्कलकोट व सध्या पशुसंवर्धन विभाग येथे सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत आहेत. पशुसंवर्धन विभागाचा कार्यभार सांभाळत स्वामी हे समाज कल्याण विभागाचा सहाय्यक प्रशासन अधिकारी पदाचा कार्यभारही सक्षमपणे सांभाळत आहेत. कोणत्याही कठीन परिस्थितीत संयमाने मार्ग काढून आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना सांभाळून घेत काम करण्याचे त्यांचे कसब कौतुकास्पद आहे. त्यांच्या काम करण्याच्या या शैलीमुळे ते नेहमीच अधिकारी व कर्मचारी वर्गात प्रिय व्यक्तीमत्व म्हणून राहिलेले आहेत.
जिल्हा परिषदेचे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विरेंद्र सिंह यांनी सिंधूदुर्गचे जिल्हाधिकारी असताना सन २०१२-१३ साली सिंधुदूर्ग जिल्हाधीकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय व दोन प्रांत कार्यालयांचे आय.एस.ओ अंतर्गत परिक्षणाचे कामकाज स्वामी यांना सोपविले होते. त्यांच्या आय.एस.ओ प्रणालीच्या कामकाजाच्या अनुभवाचा उपयोग सिंधुदूर्ग जिल्हयासाठी झाला.
सोलापूर जिल्हयाचे कामकाज करीत इतर जिल्हयासाठीही त्यांच्या कामकाजाचा अनुभव कामी आला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट सेवेचा उचीत गौरव ग्राम विकास विभागाने केला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे सर्व पदाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक अनिल नवाळे, मुख्यलेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भिमाशंकर जमादार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ, शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी स्वामी यांचे कौतूक केले. जिल्हा परिषदेतील सर्व संधटनांचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी स्वामी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज