मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । गर्दीचा फायदा घेत लोकलमध्ये चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी देखील कोरोनाचा धसका घेतला आहे. गेल्या 15 दिवसात रेल्वेत चोरीचे प्रमाण 20 टक्क्यांनी घटल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईकराची लाइफ लाइन असलेल्या लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.तिन्ही मार्गांवर गर्दीचा फायदा घेत चोरटे हे मोबाईल चोरी, पाकीटमारी करतात. दिवसाला 60 हून अधिक मोबाईल चोरीचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होतात. पण महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने लोकलमध्ये प्रवाशाची गर्दी कमी होत आहे. चोरटय़ांनी देखील कोरोनाचा धसका घेतला आहे.
1 ते 15 फेब्रुवारी या काळात तिन्ही मार्गांवर चोरीचे 1 हजार 478 गुन्हे दाखल आहेत. तर 1 ते 15 मार्च या काळात 1 हजार 236 गुन्हे दाखल आहेत. पाकीटमारी, चोरी सोनसाखळी चोरी आणि इतर चोरीचे असे मिळून 242 गुन्हे कमी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज