मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कर्जबाजारी होऊन ठाणे येथील घरातून अक्कलकोटला आलेल्या तरूणाने तहसील कार्यालयजवळ तलावातील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली.
याचे उत्तर पोलिस ठाण्यात नोंद झालेली आहे.मृताचे नाव कमलेश विठ्ठल सोनार ( वय २९ , रा . यशोधननगर ठाणे ) असे आहे. कमलेश कर्जबाजारी झालेला होता. त्यामुळे घरातून निघून तो अक्कलकोटला आलेला होता. अक्कलकोट येथील ग्रामीण रूग्णालयात तो उपचार घेऊन ठाण्याला जातो म्हणून गेला.
त्याने तहसील कार्यालयजवळ तलावातील पाण्यात आत्महत्या केली . याची माहिती किशोर केरबा सिद्धे ( रा . अक्कलकोट) यांनी उत्तर पोलिस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलिस नाईक शेख हे करत आहेत
.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज