mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मन की बात : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेले सर्व मुद्दे वाचा सविस्तर!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मन की बात : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेले सर्व मुद्दे वाचा सविस्तर!

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । भारताची कोरोनाच्या विरोधातील लढाई ही खऱ्या अर्थाने लोकांनीच नेतृत्व केलेली आहे. भारतात कोरोनाच्या विरोधातील लढाई जनता लढत आहे, आपण लढत आहात, जनतेबरोबरीने एकत्रितपणे शासन, लढत आहे. विकासासाठी प्रयत्नशील भारतासारखा विशाल देश, गरिबीशी निर्णायक लढा देत आहे.

-आपण कुठेही पाहिलंत तर, आपल्याला याची जाणीव होईल की, भारताची लढाई लोकांनी चालवलेली आहे. पूर्ण विश्व या महामारीच्या संकटाशी मुकाबला करत आहे. भविष्यात जेव्हा याची चर्चा होईल, तेव्हा भारताच्या या लोकांनी चालवलेल्या लढाईची चर्चा होणारच, असा मला विश्वास आहे.

-मित्रांनो, दुसऱ्याला मदत करण्यासाठी, आपल्या मनात, ह्रदयाच्या एखाद्या कोपऱ्यात, ही जी उचंबळून येणारी भावना आहे ना तीच भावना कोरोनाच्या विरूद्ध भारताच्या या लढ्याला ताकद देत आहे.

तीच भावना, या लढाईला खऱ्या अर्थानं लोकांनी चालवलेली लढाई बनवत आहे

-माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आज अत्यंत आदरानं, 130 कोटी देशवासियांच्या या भावनेला, नतमस्तक होऊन वंदन करतो. आपल्या देशासाठी आपल्या वेळेप्रमाणे, आपल्याला,काही तरी करणं शक्य होईल, यासाठी सरकारनं एक डिजिटल मंच तयार केला आहे

-अगदी कमी कालावधीत, या पोर्टलशी सव्वाकोटी लोक जोडले गेले आहेत. यात डॉक्टर्स, परिचारिकांपासून ते आमच्या आशा कार्यकर्त्या, आमचे एनएसएसचे साथी, वेगवेगळ्या क्षेत्रांतले सर्व व्यावसायिक, त्यांनी, या मंचाला, आपला मंच बनवून टाकला आहे

-या परिस्थितीत आपण सर्व देशवासियांनी जी संकल्प शक्ति दाखवली आहे, त्यानं, भारतात एका परिवर्तनाची सुरूवात झाली आहे. आमचे व्यवसाय, आमची कार्यालये, आमचे वैद्यकीय क्षेत्र, प्रत्येकजण, वेगानं, नव्या तांत्रिक बदलांकडे पुढे निघाला आहे.

-आपल्यातील बहुतेकांना हे ठाऊक असेल की देशातल्या प्रत्येक भागात औषधे पोहचवण्यासाठी आपण #LifeLineUdan मोहिमेद्वारे देशातल्या देशातच, 3 लाख किलोमीटर अंतराचं हवाई उड्डाण केलं आहे आणि ५०० टनाच्यापेक्षाही जास्त वैद्यकीय साहित्य, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्यापर्यंत पोहचवलं आहे.

-भारतीय रेल्वेनं जवळजवळ ६० पेक्षा जास्त रेल्वेमार्गांवर १०० हून जास्त पार्सल ट्रेन्स सुरू केल्या आहेत. औषधांचा पुरवठा करण्यात, आमच्या टपाल खात्याचे लोक, अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. आमचे हे सर्व साथीदार, खर्या अर्थानं, कोरोनाचे योद्धेच तर आहेत.

-#PMGaribKalyanYojana अंतर्गत गरिबांच्या खात्यांमध्ये, पैसे थेट जमा केले जात आहेत. वृद्धावस्था पेन्शन जारी केली गेली आहे. गरिबांना तीन महिने विनामूल्य गॅस सिलिंडर, रेशनसारख्या सुविधा प्रदान केल्या जात आहेत.

-मी, राज्य सरकारांचीही प्रशंसा करतो की ते या महामारीचा सामना करण्यात अत्यंत सक्रिय भूमिका बजावत आहेत. स्थानिक प्रशासन, राज्य सरकारं ज्या जबाबदारीचं पालन करत आहेत, त्यांची, कोरोनाच्याविरोधातल्या लढ्यात खूप मोठी भूमिका आहे. त्यांचे हे परिश्रम अत्यंत प्रशंसनीय आहेत.

-अलिकडेच जो अध्यादेश आणला आहे, त्याबद्दल समाधान व्यक्त केलं गेलं आहे. यात, कोरोना योद्ध्यांबरोबर जे हिंसा, छळ करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याविरोधात अत्यंत कडक शिक्षेची तरतूद आहे. आमचे डॉक्टर, परिचारिका, यासर्वांचं संरक्षण करण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक होतं.

-आज, देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोक स्वच्छता कामगारांवर पुष्पवर्षाव करत असल्याची छायाचित्रं येत आहेत. डॉक्टर असो, पोलिस असो, व्यवस्थेबद्दलही सामान्य लोकांच्या मानसिकतेत मोठं परिवर्तन घडलं आहे. पोलिसिंगची मानवीय आणि संवेदनशील बाजू आमच्यासमोर आली आहे.

-जेव्हा एखादं संस्कारित मन व्यवहार करत असतं तेव्हा त्यात आम्हाला संस्कृती दिसते. जेव्हा कुणी आपल्या मेहनतीनं कमावलेली, आपल्यासाठी आवश्यक असलेली वस्तु, पर्वा न करता, दुसऱ्या एखाद्या व्यक्तिची गरज पाहून, तिला देऊन त्याची गरज भागवतो, तीच तर संस्कृती आहे.

-मित्रांनो, भारतानं प्रकृती आणि विकृतीपेक्षा वेगळा असा आपल्या संस्कृतीच्या अनुरूप निर्णय घेतला. आम्ही भारताच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न तर वाढवले आहेतच, परंतु आम्ही जगातल्या सर्व गरजूंपर्यंत औषधं पोहचवण्याचा विडा उचलला आणि मानवतेचं हे काम करून दाखवलं.

-जगानं योगाचा आनंदानं स्विकार केला आहे, तसंच, आमच्या हजारो वर्षे जुन्या आयुर्वेदाच्या सिद्धांतांचाही जग अवश्य स्विकार करणार. हां, यासाठी युवा पिढीला संकल्प करावा लागेल आणि जग जी भाषा समजतं त्याच वैज्ञानिक भाषेत आम्हाला समजावून सांगावं लागेल.

-कोरोनाच्या कारणानं, जे बदल, आम्हाला आमच्या आसपास पहायला मिळत आहेत, त्यात सर्वात पहिला आहे तो मास्क चढवून आपला चेहरा झाकलेला ठेवणं. तसंतर आम्हाला सारे लोक मास्क चढवून पहायची कधीही सवय नव्हती.

-मास्कबद्दलचीही धारणा बदलणार आहे. आपण पहाल, मास्क, आता सभ्य समाजाचं प्रतिक होईल. जर, आजारापासून स्वतःला वाचवायचं असेल, आणि दुसऱ्यांनाही वाचवायचं असेल, तर आपल्याला मास्क लावावाच लागेल, माझी तर साधी सूचना अशी आहे की, उपरणं वापरा, पूर्ण चेहरा झाकला पाहिजे.

-आमच्या समाजात आणखी एक मोठी जागरूकता आली आहे की आता लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यानं काय काय प्रकारचं नुकसान होऊ शकतं, हे समजू लागले आहेत. आता ती वेळ आली आहे की, या वाईट सवयीला कायमचं संपवलं पाहिजे. तर, उशिर झाला असला तरीही, आता ही थुंकण्याची सवय सोडून दिली पाहिजे.

-आज अक्षय्य तृतियेचं पवित्र पर्व आहे, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान सूर्यदेव यांच्या आशिर्वादानं पांडवांना अक्षयपात्र मिळालं होतं, ज्यातलं अन्न समाप्त होत नसे. अन्नदाता शेतकऱ्यांच्या परिश्रमानं, आज आम्हा सर्वांसाठी, देशाकडे अक्षय अन्नभांडार आहे.

-या अक्षय तृतियेला आम्हाला आपलं पर्यावरण, वनं, नद्या आदी सर्वांच्या संरक्षणाबद्दल विचार केला पाहिजे, जे, आमच्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. आम्हाला अक्षय रहायचं असेल तर आम्हाला प्रथम आमची धरणी अक्षय राहिल, हे सुनिश्चित करावं लागेल.

-जैन परंपरेतही हा एक खूप पवित्र दिवस आहे कारण पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या जीवनात हा एक महत्वपूर्ण दिवस राहिला आहे. जैन समाजात याला एक पर्व म्हणून साजरं केलं जातं आणि कोणतंही शुभ कार्य याच दिवशी सुरू करण्यास लोक पसंती का देतात, हे समजणं सोपं आहे.

-आज भगवान बसवेश्वरजी यांचीही जयंती आहे. मला भगवान बसवेश्वर यांच्या आठवणी आणि त्यांच्या संदेशाशी जोडलं जाण्याची, शिकण्याची संधी मिळाली, हे माझं सौभाग्य राहिलं आहे. देश आणि जगभरातल्या सर्व भगवान बसवेश्वर यांच्या अनुयायांना त्यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभकामना.

-या रमजानला संयम, सद्भावना, संवेदनशीलता आणि सेवाभावाचं प्रतिक बनवावं, ही आमच्यासमोर संधी आहे. यावेळेला आम्ही, पूर्वीपेक्षा जास्त प्रार्थना करू की ईद येईपर्यत संपूर्ण जग कोरोनापासून मुक्त होईल आणि आम्ही आशा आणि उत्साहानं ईद साजरी करू शकू.

-माझ्या प्रिय देशवासियांनो, या जागतिक महामारीच्या संकटातच आपल्या परिवारातला एक सदस्य या नात्यानं, काही सूचना करणं, ही माझी जबाबदारी बनते. अतिआत्मविश्वासात, आमच्या शहरात, आमच्या गावात, आमच्या गल्लीत, आतापर्यंत कोरोना पोहचलेला नाही, म्हणून आता पोहचणार नाही, असा विचार मनात आणू नका.

-किरकोळ म्हणून सोडून दिलेली आग, कर्ज आणि आजार, संधी मिळताच पुन्हा वाढून धोकादायक बनतात. म्हणून त्यावर पूर्ण पद्धतीचे उपचार अत्यंत आवश्यक असतात. दोन फुट अंतर ठेवा, स्वतःला निरोगी ठेवा, आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्याची कामना करत, मी माझी ही मन की बात संपवत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videsh

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
सोलापूर : संचारबंदीत भरवली देवीची यात्रा ; 53 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सोलापूर : संचारबंदीत भरवली देवीची यात्रा ; 53 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 27, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 27, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा