मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत विस्तारीत माहिती दिली. पंतप्रधानांच्या पॅकेजबाबतची माहिती देण्यासाठी अर्थमंत्री सातत्याने पत्रकार परिषद घेत आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, शेल्टर होममध्ये बेघर लोकांना 3 वेळचे अन्न मिळेल. त्यासाठी वेगळ्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. ज्या लोकांकडे रेशन कार्ड किंवा इतर कोणतेच कार्ड नाही अशा नागरिकांनाही 5 किलो गहू, तांदूळ आणि एक किलो चना केंद्र सरकारकडून मदत म्हणून देण्यात येईल.
निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, केंद्र सरकारच्या या योजनेचाल लाभ 8 कोटी मजूरांना होईल. या योजनेसाठी सुमारे 3500 कोटी रुपये खरेच येणार आहे. एक देश एक रेशन कार्ड लागू होईल. ज्यामुळे स्थलांतरीत मजूरही कोणत्याही राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून आपल्या हक्काचे राशन खरेदी करु शकतील.
अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की, मजूर कल्याण हा सरकारच्या अजेंड्यावरील सर्वात वरचा मुद्दा आहे. किमान मजूरी सध्यास्थितीत केवळ 30 टक्के कामगारांनाच लागू होते आहे. ही मर्यादा आम्ही सार्वत्रिक करण्याचा विचार करतो आहोत. सोबतच कामगार सुधारणा कायद्यातही बदल केला जात आहे. राज्यात परतलेल्या कामगारांना राज्य सरकारांनी काम द्यावे. त्यासाठी देशभर एक विशेष मोहिम चालवली जात आहे. त्यामुळे जर मजुरांची इच्छा असेल तर ते त्यांच्या राज्यातही आपल्या नावाची नोंदणी करु शकतात
पुढे बोलताना निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, शहरातील गरीबांना जेवण आणि घर देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. ज्यामुळे शहरात राहणाऱ्या बेघरांना शेल्टर होममध्ये केंद्र सरकारच्या पैशातून तीन वेळचे अन्न दिले जाईल. मजूरांचे वेतन वाढविण्याबाबतही आम्ही काम करत आहोत, असेही निर्मला सीतारमण यांनी या वेळी सांगितले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक पॅकेजसंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये शेतकरी आणि मजुरांबरोबर छोट्या दुकानदारांसाठी भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर त्याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली.
Free food grains supply to all migrants for the next 2 months. For non-card holders, they shall be given 5kg wheat/rice per person & 1 kg chana per family/month for 2 months. 8 crore migrants will benefit- Rs 3500 crores to be spent on this: FM pic.twitter.com/CNmYR5EwOX
— ANI (@ANI) May 14, 2020
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) योजना सादर केल्या होत्या. आता शेतकरी आणि छोट्या दुकानदारांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
शेतकरी आणि मजुरांसाठी 9 मोठ्या घोषणा केल्या.
3 कोटी शेतकऱ्यांना 4.22 लाख कोटींचं कर्ज दिलं आहे. त्यांना पुढचे सहा महिने कर्जाची परतफेड केली नाही तरी चालणार आहे.कृषी क्षेत्रासाठी एकूण 86,600 कोटी रुपयांचं ऋण देण्याची योजना आहे.पीककर्जावर व्याजदरात सवलत देणं सुरूच राहणार 25 लाख नवी किसान क्रेडिट कार्ड लोन दिली गेली.
आतापर्यंत मजूर आणि स्थलांतरित कामगारांसाठी 11000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली.सहकारी आणि स्थानिक पतसंस्था आणि बँकांना मदत करणार. त्यासाठी 25,500 कोटींची तरतूद.राज्यांना पीकखरेदीसाठी 6700 कोटी दिले.मार्चमध्ये 4200 कोटी रुपयांचं ग्रामीण इन्फ्रा फंड देण्यात आला.शहरातल्या गरिबांना मदत करण्याकरता 7200 बचत गट स्थापन करण्यात आले.संकटकाळात या बचतगटांच्या माध्यमातून मास्क आणि सॅनिटायझर निर्णिती झाली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज