मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
भरारी पथकाच्या तपासणीत गंभीर दोष आढळून आल्याने जिल्ह्यातील चार कृषी केंद्रांवर निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी ही कारवाई केली आहे.
खरीप हंगामाच्या धर्तीवर जिल्ह्यातील रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके विक्रेत्यांच्या तपासणीसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पथके कार्यान्वित केली आहेत.
या पथकातील अधिकारी खते, कीटकनाशके व बियाण्यांच्या दुकानांची तपासणी करीत आहेत. तपासणीत किरकोळ त्रुटी आढळलेल्यांना नोटीस देऊन सुधारण्याची संधी देण्यात आली.
गंभीर दोष आढळून आलेल्यांना नोटीस देऊन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी कादगपत्र तपासणीत आढळलेल्या बाबींवरून विक्री परवाने निलंबित करण्याची कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केली आहे.
एकाची होणार फेरसुनावणी…
माऊली कृषी केंद्र बोरामणी, दक्षिण सोलापूर, शिवकृपा कृषी केंद्र चिणके, सांगोला ही दोन दुकाने सात दिवसांसाठी निलंबित केली आहेत. श्रीमंतराजे कृषी केंद्र लोंढेवाडी, माढा हे दुकान पंधरा दिवसांसाठी,
तर बालाजी कृषी केंद्र सादेपूर, दक्षिण सोलापूर हे खत दुकान एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. ओमसाई कृषी केंद्र लवंगी (सादेपूर रोड) यांची फेरसुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज