मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
तरुणांमध्ये हल्ली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. सांगोल्यात चालत्या बाईकवर एका तरुणाला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याचे समोर आले आहे.
हार्ट अॅटेक आल्याने तो चालत्या बाइकवरुनच खाली कोसळला. आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या तरुणाचा मृत्यू झाला होता.
अचानक हृदयविकाराच्या झटका आल्याने चालत्या दुचाकीवरून रस्त्यालगत खड्यात पडून मंडप व्यावसायिक तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना काल बुधवार, दि.२८ रोजी दुपारी ३ च्या सुमारास
सांगोला महूद रस्त्यावरील चिंचोली तलावाजवळ घडली. नवनाथ बसवेश्वर पलसे (वय-३५, रा. शिवणे, ता. सांगोला) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत, भाऊ आण्णासो बसवेश्वर पलसे यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
सांगोला येथे मेडिकलमधून औषध घेऊन परत दुचाकीवरून सांगोल्याकडून-महूद रोडने शिवणे घराकडे जात असताना वाटेत चिंचोली तलावाजवळ चालत्या
दुचाकीवर त्यास अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तो दुचाकीसह रस्त्याच्या कडेला खड्यात जाऊन पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून हात फॅक्चर झाला होता.
आता होणार नाहीत कुटुंबांमध्ये वाद; शेतजमीन वाटणीची नोंदणी फी माफ
शेतजमिनीच्या वाटणीनंतर नोंदणीदस्तासाठी आकारली जाणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सध्या नोंदणी फी ही शेती आणि बिगरशेती मिळकतीसाठी सारखीच आहे. ती एकूण मूल्याच्या १ टक्के पर्यंत (कमाल ३०,०००/- रुपये) आकारली जाते. मात्र, शेती मिळकतीसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र १०० रुपये असूनही नोंदणी फी माफ नव्हती. यामुळे अनेक शेतकरी दस्तांची नोंदणी टाळत होते व पुढे कायदेशीर वाद निर्माण होत होते. नव्या निर्णयाने शेतकऱ्यांवरील आर्थिक
भार कमी होईल तसेच कुटुंबात वाद निर्माण होणार नाहीत. कायदेशीर नोंदणी झाल्याने मालकीचे स्पष्ट दस्तवेजीकरण होईल. नोंदणी न केल्यामुळे भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबियांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.
मिळकत शेत जमीन असो की बिगरशेती यासाठी नोंदणी फी एक टक्के दराने आकारली जात होती. आता ही फी रह केल्याने वाटणीसंबंधी कोणताही आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडणार नाही. शेतनोंदणीला जलद चालना मिळेल.- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
महसुलात दरवर्षी ३५ ते ४० कोटींची घट
या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात दरवर्षी ३५ ते ४० कोटी रुपयांची घट येऊ शकते. मात्र शेतीच्या वाटप पत्राची नोंदणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज