मंगळवेढा टाईम्स टीम । कोरोना विषाणुने सर्व जगभरात थैमान घातलेला आहे.अक्कलकोट शहरातही या विषाणने शिरकाव केलेला आहे. त्यामुळे अक्कलकोट येथे ६ जुलै ते १३ जुलै या काळात जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. Decision to impose eight days public curfew in Akkalkot taluka
अक्कलकोट शहरात याचे प्रमाण दिवसंदिवस वाढत आहे. आजमितीस अक्कलकोट शहरात एकुण ४४ रुग्ण आढळुन आलेले असुन त्यापैकी १४ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले असून ५ रुग्ण मयत झालेले आहेत व २६ रुग्णावर उपचार सुरु आहेत.अक्कलकोट शहरातील कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.
याबाबत विचार विनिमय करणेस्तव आज दिनांक ०२ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलाविणेत आलेली होती.सदर बैठकीस खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी,आमदार सचिन कल्याणशेट्टी नगरपरिषदेचे पक्षनेता महेश हिंडोळे , न.पा.विरोधी पक्षनेता अशपाक बळोरगी , न.प.सदस्य बसलिंगप्पा खेडगी,सद्दाम शेरीकर, विकास मोरे , जितेश यारोळे , माजी नगरसेवक उत्तम गायकवाड , शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख , आर.पी.आय.चे अध्यक्ष अविनाश मडिखांबे , राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष सुनिल बंडगर , प्रहार संघटनेचे अमर शिरसाट सामाजिक कार्यकर्ते बंटी राठोड , चंदन आडवितोटे , सुभा पुजारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
याबैठकीत अक्कलकोट शहरातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेबाबत सविस्तर चर्चा झाली.सर्वांनी अक्कलकोट शहरातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणेस्तव दिनांक ०६/०७/२०२० ते १३ / ०७ / २०२० असे एकूण ८ दिवस अक्कलकोट शहरामध्ये जनता कफ्फ्यु लागु करणेचा निर्णय घेतलेला आहे.
त्यामुळे शोभा शि.खेडगी , नगराध्यक्षा नगरपरिषद अक्कलकोट यांनी अक्कलकोट शहरातील नागरिकांना आवाहन केले की , नागरिकांनी जनता कर्फ्यू तंतोतंत पालन करावे , कोणीही घराबाहेर पडु नये , अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे , बाहेर फिरताना तोंडावर मास्कचा वापर करावा , सोशल डिस्टन्सिंग पाळावे , नगरपरिषदेचे पथक तपासणीसाठी आल्यानंतर त्यांना योग्य ते सहकार्य करावे , सर्वांनी तपासणी करुन घेऊन , खरी माहिती सांगावी , माहिती लपविण्याचा प्रयत्न करु नये.
संशयित व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरीत ग्रामीण रुग्णालयास द्यावी व त्याला ग्रामीण रुग्णालयात नेऊन त्याची तपासणी करावी.घरामध्ये कोणास ताप , सर्दी खोकला , घशामध्ये दुखणे यासारखे आजार असल्यास त्वरित ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्यावर डॉक्टरांच्या सल्याने उपचार करावे . कोणीही घाबरु नये परंतु स्वतःची काळजी घ्यावी.घरातील वयोवृध्द व्यक्ती व लहान मुलांना घराबाहेर सोडू नये , व नगरपरिषदेस सहकार्य करावे.
अक्कलकोटला ६ जुलै ते १३ जुलै या काळात जनता कर्फ्यू लागू या काळात फक्त दूध व मेडिकल हे दोनच व्यवहार चालू राहणार .कोरोनाची साखळी तोडण्यासाठी योग्य पाऊल उचलण्यात आले आहे
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज